AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समाधान आवताडेंचा विजय महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा, चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

समाधान आवताडेंचा विजय महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. (samadhan autade pandharpur mangalwedha by election)

समाधान आवताडेंचा विजय महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा, चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
| Updated on: May 02, 2021 | 4:40 PM
Share

पुणे : देशात 5 विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबतच आज (2 मे) पंढरपूर मंगळवेढा (Pandharpur Mangalwedha by election) या विधनासभेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. मात्र, सध्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालानंतर येथे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांचाच विजय होण्याची शक्यता आहे. ते हजारो मतांनी सध्या आघाडीवर आहेत. याच विजयाच्या शक्यतेमुळे भाजपमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. या विजयाविषयी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली. त्यांनी समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा आहे,  असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) भाष्य केले. ते पुण्यात ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (BJP leader Chandrakant Patil criticizes Maha vikas aghadi on victory of BJP candidate Samadhan Autade in Pandharpur Mangalwedha by election)

चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी येथे मतमोजणी सुरु आहे. या जागेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरले होते. तिन्ही पक्षांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र, सध्या मतमोजणीमध्ये पंढरपूरमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर आहेत. त्यावर भाष्य़ करताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर कठोर शब्दांत टीका केली. समाधान आवताडे याचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखं आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसच्या राजकीय अस्तित्वाबद्दल भाष्य केले. त्यांनी पाच राज्यांच्या निकालानंतर देशात काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे, अशी शेलकी टीका केली.

फडणवीस जे बोलतात ते करुन दाखवतात

यावेळी पुढे बोलताना त्यांनी भाजप यानंतरच्या सर्व निवडणुकीत संघटनात्मक पद्धतीने काम करणार असे सांगितले. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात. पाच राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे. यापुढच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही संघटनात्मक पद्धतीने काम करणार,” असे चंद्रकांत पाटील.

दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा या जागेसाठी अजूनही मतमोजणी सुरुच आहे. सध्या हाती आलेल्या ताज्या निकालानुसार मतमोजणीच्या 35 व्या फेरीत भाजपचे समाधान आवताडे हे 4395 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना एकूण 101607 मते मिळाली असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना आतापर्यंत 97212 मते मिळाली आहेत. अजूनही येथील मतमोजणी सुरुच आहे.

इतर बातम्या :

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नंंदीग्राममधून ममता दीदी जिंकल्या, अटीतटीच्या लढतीत तृणमूलचा विजय

Belgaum Election Result 2021 LIVE | सतीश जारकीहोळींना पुन्हा आघाडी, मंगला अंगडी पिछाडीवर

West Bengal Election Results 2021 LIVE: ममता बॅनर्जींनी नंदीग्रामची लढाई जिंकली; चुरशीच्या लढतीत सुवेंदू अधिकारींचा 3727 मतांनी पराभव

(BJP leader Chandrakant Patil criticizes Maha vikas aghadi on victory of BJP candidate Samadhan Autade in Pandharpur Mangalwedha by election)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक