AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाण किंवा दीपक केसरकरांची नाराजी काहीतरी पदरात पाडण्यासाठी, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

कर्नाटकातील मराठी भाषिक गावं ही महाराष्ट्रात आली पाहिजेत," अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (Chandrakant Patil On Deepak Kesarkar And Ashok Chavan Dissatisfaction)

अशोक चव्हाण किंवा दीपक केसरकरांची नाराजी काहीतरी पदरात पाडण्यासाठी, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
| Updated on: Nov 01, 2020 | 12:40 PM
Share

पुणे : “सिंधुदुर्गातील शिवसेना नेते दीपक केसरकर यांची नाराजी त्यांचे पक्षप्रमुख दूर करतील,” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी सरकारमधील अंतर्गत कुरबुरी समोर येत आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता दीपक केसरकरांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Chandrakant Patil On Deepak Kesarkar And Ashok Chavan Dissatisfaction)

“शिवसेना नेते दीपक केसरकर यांची नाराजी त्यांचे पक्षप्रमुख म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूर करतील. मात्र अशोक चव्हाण असू दे किंवा दीपक केसरकर यांची नाराजीही काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी आहे,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

“बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी गेली ६२ वर्षे सीमावासियांना लढा सुरु आहे. या आंदोलनाला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. कर्नाटकातील मराठी भाषिक गावं ही महाराष्ट्रात आली पाहिजेत,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

“तसेच मराठा आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी यांच्यातील संघर्ष दुर्दैवी आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिले, तर गावोगावी भांडणं लागतील,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दीपक केसरकरांची नाराजी 

महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर केसकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे दीपक केसरकर सत्ताकेंद्रापासून दूर फेकले गेले होते.  दीपक केसरकर तेव्हापासून जवळपास राजकीय अज्ञातवासात गेले होते. मात्र, शनिवारी त्यांनी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली नाराजी बोलून दाखवली.

“मला स्वत:चे नाही पण सिंधुदुर्गाच्या वाटचे मंत्रिपद गेल्याचे दु:ख वाटते. यापूर्वी मला पंतप्रधान कार्यालयात बोलावून भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली होती. गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ही बाब माहिती आहे. पण तेव्हा मी भाजपमध्ये गेलो नाही,” असे दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

दरम्यान काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, या अशोक चव्हाणांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला, असे चव्हाण यांनी म्हटले होते. (Chandrakant Patil On Deepak Kesarkar And Ashok Chavan Dissatisfaction)

संबंधित बातम्या : 

कानडी पोलिसांचा आदेश झुगारत मराठी बांधव काळा दिन साजरा करण्यासाठी एकत्र, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध

उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : केसरकर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.