AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सत्ता येणार असल्याचे स्वप्न पाहणाऱ्या मविआत खातेवाटपावरुन भांडणे सुरू’, सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

"मोदी पंतप्रधान होणार नाहीत आणि भाजप पक्ष फुटणार हे मुंगेरीलाल के हसीन सपने असून अशा टीका थांबवता येत नाही. सत्ता येणार असल्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये खातेवाटपावरुन भांडणे सुरू झाली आहेत", असा टोला भाजप नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

'सत्ता येणार असल्याचे स्वप्न पाहणाऱ्या मविआत खातेवाटपावरुन भांडणे सुरू', सुधीर मुनगंटीवार यांचा टोला
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 16, 2024 | 11:00 PM
Share

चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक गायब झाल्याच्या चर्चांवर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. “अजित दादा कमी ठिकाणी प्रचाराला गेल्याची हूल उडवणाऱ्यांची कीव येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचारात कुठेही कमी पडले नाहीत”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. “मोदी पंतप्रधान होणार नाहीत आणि भाजप पक्ष फुटणार हे मुंगेरीलाल के हसीन सपने असून अशा टीका थांबवता येत नाही. सत्ता येणार असल्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये खातेवाटपावरुन भांडणे सुरू झाली आहेत”, असा टोला भाजप नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. तर 5 जूनपर्यंत त्यांना आनंदात राहू द्या असे म्हणत पब्लिक हैं सब जानती हैं असे सांगत मुनगंटीवार यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

“जिरेटोप हे प्रतीक आहे. मोदींनी जिरेटोप घातला नाही तर कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी सत्कार करताना घातला. यात मोदींजींचा काय दोष? विरोधक शरद पवारांना जाणता राजा म्हणतात. अफजल गुरूला फाशी देऊ नका म्हणत कसाबला बिर्याणी खाऊ घालतात. अमेरिकेत जाऊन देशाची निंदा करतात. मणिपूरमध्ये भारत मातेचा मृत्यू झाला असे सांगतात. त्यांच्या बुद्धिची कीव येते. हा राजकारणाचा विषय असू शकतो का? देवाने यांना चांगली बुद्धी दिली असती तर त्यांनी अशी वक्तव्ये केली नसती. मोदींजींच्या डोक्यावर घातलेल्या जिरेटोपावर केलेली टीका म्हणजे बुद्धी कमी असल्याचे प्रतीक”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

‘ते स्वतःच्या मनाचे समाधान करून घेतात’

“विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत. वैफल्यग्रस्त झाल्याने आशा पद्धतीचे वक्तव्य केली जात आहेत. मोदी प्रधानमंत्री बनणार नाहीत अशी वक्तव्ये करून स्वतःच्या मनाचे समाधान करून घेत आहेत. परंतु ते खोटं समाधान आहे. 20 जागांवर लढणारे ठाकरे आणि 10 जागांवर लढणारे शरद पवार पंतप्रधान होऊ शकतील का? असा सवाल इंडिया आघाडीत अस्थिरता आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमधील कोणीही पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबद्दल बोलत नाही. पहिल्यांदा गुणपत्रिका द्या. नंतर आम्ही उत्तरपत्रिका देऊ अशी अवस्था आहे”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

‘सत्ता येणार नसल्याचे लक्षात आल्याने…’

“इंडिया आघाडीला फुटण्याची शक्यता असल्याने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करत नाहीत. सत्ता येणार नसल्याचे लक्षात आल्याने प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करण्याचा नवीन विचार पुढे आला आहे. आपण सर्व एकत्र आलो तरीही मोदीजींचा पराभव करणे शक्य नाही, म्हणून त्यांनी असा निर्णय केला आहे. काँग्रेसमध्ये जायचं आणि थोड्याशा इक्विटीच्या भरोशावर काँग्रेस पक्ष ताब्यात घ्यायचा. काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन करण्याचा नवीन विचार आहे. काँग्रेस नावाची पारिवारिक कंपनी चालवायची”, अशी जहरी टीका मंत्री मुनगंटीवार यांनी सातपाटी येथे केली.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली