AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2025 : लिहून घ्या..रेकॉर्ड करा…काहीही झालं तरी मुंबईवर…महापौरपदावर फडणवीसांचं मोठं विधान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. त्यांनी आज आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तसेच मुंबईच्या विकासाचे व्हिजन मांडले.

BMC Election 2025 : लिहून घ्या..रेकॉर्ड करा...काहीही झालं तरी मुंबईवर...महापौरपदावर फडणवीसांचं मोठं विधान!
devendra fadnavis
| Updated on: Sep 16, 2025 | 8:39 PM
Share

Devendra Fadanvis : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीत मुंबई पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. काहीही झालं तरी आम्हीच मुंबई जिंकणार, असा विश्वास प्रत्येकाकडून व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी माझे विधान रेकॉर्ड करा, काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचंच सरकार येणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस आज मुंबईत भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाला फडणवीस यांच्यासोबतच भाजपाचे इतरही महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ठाकरे मुंबईच्या विकासावर बोलत नाहीत. त्यांच्याकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीच नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

व्हिडीओ रेकॉर्ड करा, जपून ठेवा

तसेच पुढे बोलताना त्यांनी महायुतीवरही भाष्य केलं. त्यांनी माध्यमांना उद्देशून आज माझे शब्द लिहून घ्या. व्हिडीओ रेकॉर्ड करा. तो जपून ठेवा आणि नंतर सगळीकडे दखवा की काहीही झालं तरी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. काहीही झालं तरी मुंबई पालिकेवर महायुतीचंच सरकार येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आम्ही धारावीच्या दहा लाख लोकांना…

मुंबईच्या गिरणगावात राहणारा मराठी माणूस आज वसई विरार, कर्जतकडे फेकला गेला आहे. आम्ही मात्र बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला. म्हाडाच्या माध्यमातून मराठी माणसाला हक्काचे घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्यांच्या हाती मुंबईची सत्ता होती त्यांना स्वप्नही बघता येत नव्हते आणि लोकांचे स्वप्नही पूर्ण करता येत नव्हते, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे यांना टोला लगावला. मुंबईतील धारावी प्रकल्पावरही त्यांनी भाष्य केले. आम्ही धारावीच्या दहा लाख लोकांना घर देत आहोत. या सर्व लोकांना धारावीतच घर देण्यात येणार आहे. प्रत्येकाला घर देणारा आमचा हा प्रकल्प आहे, असे सांगत त्यांनी आमचे सरकार मुंबईच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.