AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांनी स्वप्न पाहू नये, ही विधानसभा निवडणूकही भाजपच जिंकणार : चंद्रकांत पाटील

महिनाभरात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पवारांनी स्वप्न पाहू नये, ही विधानसभा निवडणूकही भाजपच जिंकणार : चंद्रकांत पाटील
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 08, 2019 | 11:47 PM
Share

बारामती : महिनाभरात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या विधानसभा निवडणुकीतही सत्ता भाजपकडेच (BJP) राहिल, असा दावा केला आहे. सरकार भाजपचंच येणार आहे हे शरद पवारांना (Sharad Pawar) सांगा. ते अजूनही विधानसभा जिंकण्याचं स्वप्न पाहत आहेत, असाही टोला पाटील यांनी पवारांना लगावला. ते बारामतीत (Baramati) भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आले असताना बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना लोकसभेतील पराभवाने नाउमेद न होता 2024 ची निवडणूक जिंकण्याचं लक्ष्य ठेवण्याचं आवाहन केलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांनाही आपलं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर उपस्थितांनी होकार दिला. त्यानंतर हे पवारांनाही सांगा. पवारांना आजही विधानसभेत सत्ता येईल असंच वाटत आहे, असा टोला पवारांना लगावला.

‘लोकसभेच्या निकालाची पवारांना धास्ती होती’

लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होईपर्यंत शरद पवार यांना बारामतीच्या निकालाची शाश्वती नव्हती. निकालात काही गडबड होते का अशीच शंका त्यांना होती. इतकी निकराची लढाई भाजपनं या मतदारसंघात केल्याचंही चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं. लोकसभेच्या निकालानं नाउमेद न होता कुठे कमी पडलो, आता पुढे काय करायचे याचा विचार करून 2024 च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करायचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

बारामतीतील भाजप इनकमिंगवरही भाष्य

भाजपच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला मंचावर अनेकजण उपस्थित होते. त्याचा आधार घेत चंद्रकांत पाटील यांनी बारामतीतील भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगवरही भाष्य केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, “इथं बसायला जागा नाही ही आनंदाची बाब आहे. इथं लोक बिनधास्तपणे बसत आहेत. आपण नेतृत्व करू असं म्हणत आहेत. त्यामुळं आपण मोजक्याच लोकांची नावं घेणार आहोत.

‘बारामतीची जागा कुणालाही मिळो, आपण ताकदीनं लढणार’

चंद्रकांत पाटील म्हणाले, “बारामतीची जागा कोणाला द्यायची याबाबत खलबतं सुरू आहेत. मात्र, ही जागा कुणालाही मिळाली, तरी येथे प्रचंड ताकदीनं निवडणूक लढवू.”

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत