AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आडवंच करायचं असेल तर बोलायचं कशाला?, जे आहे ते करुन टाकावं; भाजपचं उद्धव ठाकरेंना आव्हान

शेण, गोमूत्र, आडवे करू, तिडवे करू अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्रिपदावरच्या माणसाची असू शकत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (Chandrakant Patil Uddhav Thackeray)

आडवंच करायचं असेल तर बोलायचं कशाला?, जे आहे ते करुन टाकावं; भाजपचं उद्धव ठाकरेंना आव्हान
| Updated on: Nov 26, 2020 | 5:07 PM
Share

सोलापूर :”शेण, गोमूत्र, आडवे करू, तिडवे करू अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्रिपदावरच्या माणसाची असू शकत नाही. आडवे करायचं असेल, तिडवे करायचे असेल तर बोलायचे कशाला ? जे आहे ते करून टाकावं,” असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले. (Chandrakant Patil criticizes Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना मुलाखत दली. ही मुलाखत शुक्रवारी (27 नोन्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीत ‘कोणी कितीही आडवे आले तरी त्यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल.’ असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी केले. यावर बोलताना चंद्रकातं पाटलांनी वरील भाष्य केले. ते सोलापूरमध्ये ”टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

“शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरसुद्धा उद्धव ठाकरे यांचं असंच भाषण झालं. शेण, गोमूत्र, आडवे करू, तिडवे करू अशी भाषा मुख्यमंत्री पदावर असलेल्या माणसाची असू शकत नाही. त्यांना जर अशीच भाषा वापरायची असेल तर, सर्वसामान्य लोकांनासुद्धा जे सुरु आहे; ते बरोबर नाही हे समजत आहे.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

गरजेल तो पडेल काय?

यावेळी, चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान केलेल्या भाष्यावरुन उद्धव यांना लक्ष्य केलं. त्यांनी, आडवं करायचं असेल, तिडवे करायेच असेल तर बोलायचे कशाला?जे आहे ते करुन टाकावं, असे म्हणत गरजेल ते पडेल काय अशी खोचक टीका केली.

मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे. या मुलाखतीचा प्रोमो नुकतंच प्रदर्शित करण्यात आला. यात राज्यातील कोरोना स्थिती, भाजपाकडून होणारी टीका, सरकारसमोरील आव्हान याबाबतची भाष्य करण्यात आलं आहे. ही मुलाखत शुक्रवारी (27 नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. यावेळी, विरोधकांना उद्देशून “विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करु नका. पण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती मिळते. कोणी कितीही आडवे आले तरी त्यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल.” असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

रोहित पवारांना बळ, पार्थ पवारांना डावललं, पवार कुटुंबात सारं काही अलबेल नाही?; ‘या’ पुस्तकातील खळबळजनक दावे

EXCLUSIVE : फडणवीस म्हणाले, तुमच्यासोबत कोण, दादा म्हणाले धनंजय मुंडे, सुनील शेळके, संदीप क्षीरसागरसह 28 जण!

सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले, परदेशात मालमत्ता घेतल्या; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

(Chandrakant Patil criticizes Uddhav Thackeray)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली