AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही’, एका मंत्र्याबाबत चंद्रकांत पाटालांचा खळबळजनक दावा

शरद पवार यांनी तर एका मुलाखतीत काँग्रेसला उत्तर प्रदेशातील जमीनदाराची उपमा दिली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये टीका-टिप्पणी सुरु आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडूनही काँग्रेसला टोले लगावले जात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील एका नेत्याबाबत खळबळजनक दावा केलाय.

'भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही', एका मंत्र्याबाबत चंद्रकांत पाटालांचा खळबळजनक दावा
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 9:22 PM
Share

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये मात्र अनेकदा विसंवाद पाहायला मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर एका मुलाखतीत काँग्रेसला उत्तर प्रदेशातील जमीनदाराची उपमा दिली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये टीका-टिप्पणी सुरु आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडूनही काँग्रेसला टोले लगावले जात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील एका नेत्याबाबत खळबळजनक दावा केलाय. (Chandrakant Patil’s sensational claim about a minister in the Mahavikas Aghadi government)

उद्धव ठाकरे यांनी भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, अशा शब्दात सरकारमधील मित्र असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यांने आपल्याकडे भावना वक्त केल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्यामुळे कितीही कुरबुरी झाल्या तरी ते सत्ता सोडणार नाहीत, असा टोलाही पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी नेमक्या कोणत्या नेत्याबाबत हा गौप्यस्फोट केला आहे, याबाबत नेमका अंदाज बांधणं कठीण आहे.

शरद पवारांनी काँग्रेसबाबत कोणतं उदाहरण दिलं?

‘उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. आता त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकदही त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनी आता 15-20 एकरवर आल्या आहेत. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असं सांगत पवारांनी काँग्रेसची आजची स्थिती विषद केली.

नाना पटोलेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

काँग्रेसनं अनेक लोकांना जमीन राखायला दिली. ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असं शरद पवार यांना म्हणायचं असेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे. दुसऱ्या पक्षाबद्दल प्रतिक्रिया द्यायला नको. असं म्हणत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 2024 ला काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार. कुणाला काय बोलायचं याचं लोकशाहीत स्वातंत्र्य आहे, असंही पटोले टीव्ही 9 शी बोलताना म्हणाले.

‘ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला’

काँग्रेस जमीनदारांचा पक्ष नाही. काँग्रेसनं जमीनदारी केली नाही. काँग्रेसनं ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला. सामान्य जनता काँग्रेससोबत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो आम्ही चालू देणार नाही. 2024 मध्ये काँग्रेसच देशाचं नेतृत्व करेल, असा विश्वासही पटोले यांनी यावेळी व्यक्त केलाय. शरद पवार यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली नाही. जमिनदारांचं उदाहरण दिलंय, असंही पटोले म्हणाले.

फडणवीसांचा काँग्रेसला टोला

“काँग्रेसचं वर्णन हे शरद पवार यांनी केलेल्या वर्णनापेक्षा वेगळं असूच शकत नाही. कारण काँग्रेस आज जुन्या पुण्याईवर चालली आहे. आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर गुजराण सुरु आहे. तशा प्रकारचंच वर्णन पवारसाहेबहांनी केलं आहे आणि ते काँग्रेसला चपखल लागू पडतं”, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

इतर बातम्या :

मुंबईतलं निर्भया बलात्कार कांड, मुख्यमंत्र्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना 5 मोठ्या सुचना, वाचा सविस्तर

वर्षभर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांनाही मारहाण, पुण्यातल्या नण्या वाघमारे गँगचं भयानक कृत्य

Chandrakant Patil’s sensational claim about a minister in the Mahavikas Aghadi government

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.