Gulabrao Patil : मुख्यमंत्री बरोबर बोलतात, पन्नास थरांची दहीहंडी फोडली म्हणूनच राज्यात सत्तांतरण; गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

आम्ही पन्नास थरांची दहीहंडी (Dahi Handi) फोडली म्हणूनच राज्यात सत्तांतर झाले, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यावर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Gulabrao Patil : मुख्यमंत्री बरोबर बोलतात, पन्नास थरांची दहीहंडी फोडली म्हणूनच राज्यात सत्तांतरण; गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदेImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 10:31 AM

जळगाव :  आम्ही पन्नास थरांची दहीहंडी (Dahi Handi) फोडली म्हणूनच राज्यात सत्तांतर झाले, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यावर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री बरोबर बोलत आहेत. एकनाथ शिंदे यांनी पन्नास थरांची दहीहंडी फोडली म्हणूनच राज्यात सत्तांतर झाले.  त्यांनी जर पन्नास थरांची दहीहंडी फोडली नसती तर राज्यात सत्तांतर अशक्य होते, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र त्यांनी यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याबाबत बोलणे टाळले आहे. अदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत त्यांना विचारले असता, आदित्य ठाकरे यांचे पक्षाचे काम आहे त्यासाठी ते येत आहेत त्यांना येऊ द्या. त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलंच पाहिजे अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे.

‘मुख्यमंत्री बरोबर बोलले’

राज्यात गेल्या दोन महिन्यात वेगवान घडामोडी घडल्या, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. सरकार अल्पमतात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. शिंदे यांना त्यावेळी अपक्ष आणि शिवसेनेच्या मिळून एकूण 50 आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर अनपेक्षीतरित्या मुख्यमंत्रीपदाची माळ शिंदे यांच्या गळ्यात पडली. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एका कार्यक्रमात म्हटलं की, आम्ही 50 थरांची दहीहंडी फोडली म्हणून राज्यात सत्ता बदल झाला. याबाबत गुलाबराव पाटलांना विचारले असता त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री बरोबर बोलत आहेत. एकनाथ शिंदे यांनी 50 थरांची दहीहंडी फोडली म्हणूनच राज्यात सत्ता बदल झाला.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंवर बोलणे टाळले

युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची तोफ जळगावमध्ये धडाडणार आहे. याबाबत गुलाबराव पाटलांना विचारले असता त्यांनी सावध भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. आदित्य ठाकरे यांना जळगावला येऊ द्यात, ते पक्षाच्या कामासाठी येत आहेत. ते त्यांचं काम आहे आणि ते त्यांनी केलंच पाहिजे अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.