AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री मध्यरात्री एक वाजता दिल्लीत, या तीन मुद्द्यांवर मोदींशी चर्चा

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी रात्री एक वाजता दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची बैठक झाली. या बैठकीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत सकारात्मक चर्चा केली आणि धनगर आरक्षणाची मागणी केली. तर लोकसभा निवडणुकीचा अहवालही सादर केला. मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना एक दिवस अगोदरच मुख्यमंत्री दिल्लीत […]

मुख्यमंत्री मध्यरात्री एक वाजता दिल्लीत, या तीन मुद्द्यांवर मोदींशी चर्चा
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM
Share

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी रात्री एक वाजता दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची बैठक झाली. या बैठकीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत सकारात्मक चर्चा केली आणि धनगर आरक्षणाची मागणी केली. तर लोकसभा निवडणुकीचा अहवालही सादर केला.

मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना एक दिवस अगोदरच मुख्यमंत्री दिल्लीत गेले. बैठकीबाबत जी गुप्तता पाळण्यात आली, त्यावरुन अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. टीव्ही 9 मराठीला मिळालेल्या एक्स्क्लुझिव्ह माहितीनुसार, वरील तीन मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.

धनगर आरक्षण हा राज्य सरकारसाठी गंभीर विषय बनलाय. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा प्रश्न सोडवू, असं आश्वासन भाजपने सत्ता येण्याअगोदर दिलं होतं. पण चार वर्ष उलटल्यानंतरही धनगर समाजाला मागणीसाठी आंदोलनाची वेळ येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता केंद्रीय पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत.

युतीशिवाय राज्यात सत्ता मिळवणं कठीण असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येतंय. कारण, एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत आहे. तर शिवसेना आणि भाजपच्या मतांचं विभाजन होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक होती, अशी माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत भाजपची राज्यात तयारी सुरु आहे. या तयारीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द केला.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.