AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cm Eknath Shinde : आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी, शिंदे गट आणि भाजपसाठी आजचा पेपर किती अवघड? संख्याबळ काय सांगतं?

राजकीय घडामोडींमध्ये विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहिली आहे. आजही त्यांचा रोल तेवढाच मोठा राहणार आहे. हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही असे दावे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेकदा करण्यात आले. तर शिंदेंसमोरील आव्हान अजून सोपं दिसतंय.

Cm Eknath Shinde : आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी, शिंदे गट आणि भाजपसाठी आजचा पेपर किती अवघड? संख्याबळ काय सांगतं?
आज शिंदे सरकारची बहुमत चाचणीImage Credit source: tv9
| Updated on: Jul 04, 2022 | 6:29 AM
Share

मुंबई : कुठलेही नवं सरकार स्थापन झालं की त्याला एक अग्नी परीक्षा ही द्यावीच लागते ती म्हणजे बहुमत चाचणीची, आज शिंदे गटाची (Eknath Shinde) आणि भाजप सरकारची बहुमत चाचणीची (Floor Test) अग्निपरीक्षा आहे. कालचा पेपर तर सरकारला सोपा गेला. काल मापक संख्याबळाच्या जोरावर विधानसभा अध्यक्षांची निवड (Assembly Speaker) करणे सरकारला सहज शक्य झालं. मात्र आजही सरकार अशीच बाजी मारणार की भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या आनंदात महाविकास आघाडी काही विघ्न आणणार? हेही पाहणे तेवढेच महत्त्वाचं ठरणार आहे. कालच्या राजकीय घडामोडींमध्ये विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहिली आहे. आजही त्यांचा रोल तेवढाच मोठा राहणार आहे. हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही असे दावे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेकदा करण्यात आले.

फडणवीस-शिंदेंचे सर्व डावपेच यशस्वी ठरले

मात्र त्यांचे आजपर्यंतचे सर्व दावे फेल ठरले आहेत आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा प्रत्येक डावपेस हा यशस्वी ठरला आहे. त्यांचे हेच डावपेच त्यांना सत्तेच्या खुर्ची पर्यंत घेऊन गेले आहेत. मात्र आज सरकारला बहुमत चाचणीच्या या सर्वात मोठ्या कसोटीला पार करावं लागणार आहे.

आकडे कुणाच्या बाजुने?

या बहुमत चाचणीचं गणित कसं असणार आहे, हे एकदा आकड्यांच्या खेळातूनही समजून घेऊया. काल विधानसभा अध्यक्ष निवडीमध्ये शिंदे सरकारला 164 आमदारांचा पाठिंबा असल्याचे जाहीरपणे दिसून आले. त्याच जोरावर राहुल नार्वेकरांचा विजय झाला. तर रविवारी महाविकास आघाडीची गाडी मात्र केवळ 106 मतांवर अडकलेले दिसून आले. अर्थात संख्याबळ कमी असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. आजचा चित्रही काहीसं असंच राहणार आहे.

विधीमंडळाच्या निर्णयाने गणित बदललं

आकड्यांचा गणित हे कालपर्यंत तर असंच राहिलं होतं. मात्र कालच एक असा मोठा निर्णय आला ज्याने आकड्यांचे गणित आणखी हलून जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळाने एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला तर उद्धव ठाकरे यांना एक मोठा दणका दिला. एकनाथ शिंदे हेच गटनेते राहतील असा निर्णय विधिमंडळाने दिला, तर अजय चौधरी यांचे गटनेतेपद विधिमंडळाने रद्द केलं आहे. त्यामुळे आजच्या बहुमत चाचणीमध्ये शिवसेनेचे उर्वरित आमदार कुणाच्या व्हीप वरती मतदान करणार हेही अनिश्चित आहे. हा वाद वाढल्यास या आमदारांना मतदान करता येणार नाही, शिवसेने पुढे आता कोर्टात जाण्याचा एकमात्र मार्ग उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा राज्याच्या राजकारणात वादळी ठरणार एवढं मात्र नक्की.

Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.