AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाही, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर घणाघात

नागपूर : ‘अनुसूचित जाती मोर्चा’च्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशात मोदीजींच्या नेतृत्वात गरीब, अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी भाजप सरकार काम करत आहे. मोदी सरकार आणि दुसऱ्या सरकारमध्ये फरक बघितलं तर कथनी आणि करणी याचा फरक आहे. साडेचार वर्षात आम्ही काम केलं. देशात मोदीजींच्या सरकारने स्वप्न साकार केले, असे मुख्यामंत्र्यांनी यावेळी […]

आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाही, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर घणाघात
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM
Share

नागपूर : ‘अनुसूचित जाती मोर्चा’च्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशात मोदीजींच्या नेतृत्वात गरीब, अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी भाजप सरकार काम करत आहे. मोदी सरकार आणि दुसऱ्या सरकारमध्ये फरक बघितलं तर कथनी आणि करणी याचा फरक आहे. साडेचार वर्षात आम्ही काम केलं. देशात मोदीजींच्या सरकारने स्वप्न साकार केले, असे मुख्यामंत्र्यांनी यावेळी सांगितले.

“आज 70-80% लोकांकडे घर नाहीत, परंतू 2022 पर्यंत सगळ्यांना घर मिळणार. गरीबांना लुटण्याचं काम काँग्रेस सरकारने केलं. सगळ्यांच्या घरात लाईट पोहचवण्याचं काम मोदींनी केलं”, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा फोलपणा दाखवत भाजपने केलेल्या विकासाचा पाढा वाचला.

“बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसने बाबासाहेबांना रोखलं होतं, निवडणुकीत बाबासाहेबांना काँग्रेसन हरवलं, मात्र अनुसूचित जातीचा वापर काँग्रेसने वोट बँक म्हणून केला. आता त्यांचा विकास होत आहे. भारतीय संविधानाला कुणीच बदलू शकत नाही. जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत संविधानाला कोणी हातही लावणार नाही”, असेही फडणवीसांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, “काही पक्ष मोदींच्या विरोधात मोर्चा उठवत आहेत. मात्र, त्याची आम्हाला चिंता नाही, कारण अनुसूचित जाती आमच्यासोबत आहेत. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काँग्रेसने एक इंचही जागा दिली नाही. इंदुमिलची जागा काँग्रेसला बळकवायची होती, मी मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी तीन दिवसांच्या आत महाराष्ट्र सरकारला जमीन दिली. त्यामुळे आज आम्ही बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम केलं.”

“2020 मध्ये चैत्यभूमीवर तुम्हाला इंदू मिल जागेवर स्मारक उभे दिसेल. लंडनचे घर विकायला निघाले होते. केंद्र सरकारच्या मदतीने लंडनचे घर विकत घेतले. जुलै महिन्यात हे घर आम्ही सर्वांसाठी खुले करू. देशात आणि केंद्रात असलेले सरकार अनुसूचित जातीचे हित लक्षात घेणारे सरकार आहे. अनुसूचित जातींसाठी कार्य करणारा पक्ष म्हणजे भाजप. 2014 मध्ये सर्वात जास्त अनुसूचित जातीचे खासदार निवडणून आले. 2019 मध्ये देखील सर्वात जास्त अनुसूचित जातीचे खासदार भाजपचे राहतील”, असा विश्वासही यावेळी  मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.