AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारचा धक्का, युती सरकारच्या काळातील आणखी एक योजना बंद

भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारने सुरु केलेली चांदा ते बांदा ही योजना ठाकरे सरकारने गुंडाळली (Chanda te Banda scheme close) आहे.

ठाकरे सरकारचा धक्का, युती सरकारच्या काळातील आणखी एक योजना बंद
| Updated on: Jan 16, 2020 | 9:13 PM
Share

सिंधुदुर्ग : भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारने सुरु केलेली चांदा ते बांदा ही योजना ठाकरे सरकारने गुंडाळली (Chanda te Banda scheme close) आहे. माजी अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ही योजना बंद केल्याने याचा मोठा फटका सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्याला बसणार आहे.

चांदा ते बांदा या कार्यक्रमास 2016-2017, 2019-2020 या 4 वर्षांच्या कालावधीसाठी राबवण्यास मान्यता दिली होती. या कार्यक्रमास आवश्यकेतनुसार मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर सध्या कोणत्याही नवीन कामांना/ योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये. तसेच ज्या कामांना या पत्रापूर्वी मान्यात दिली आहे अशा कामांचा कार्यारंभ करु नये असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

विविध संसाधनाचा नियोजनबद्ध वापर करण्यासोबतच रोजगाराच्या संधी तसंच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी ‘चांदा ते बांदा’ ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत होती. मात्र ही योजना बंद करावी, असे आदेश ठाकरे सरकारने दिले (Chanda te Banda scheme close) आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिपक केसरकर यांच्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांची कामं या योजनेतून प्रस्तावित करण्यात आली होती. तसेच चंद्रपुर जिल्ह्यातही या योजनेअंतर्गत अनेक कामे सुरू होती. मात्र ही योजना गुंडाळण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तसेच यावरुन शिवसेनेत अंतर्गत संघर्षही निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चांदा ते बांदा ही योजना बंद करु नये अशी मागणी सातत्याने शिवसेनेचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर करत होते. तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनी ही योजना बंद करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती नुकत्याच सिंधुदुर्ग दौऱ्यात दिली होती. मात्र ही योजना गुंडाळण्यात आल्याने याचा मोठा फटका सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्याला बसण्याची शक्यता (Chanda te Banda scheme close) आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.