ठाकरे सरकारचा धक्का, युती सरकारच्या काळातील आणखी एक योजना बंद

भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारने सुरु केलेली चांदा ते बांदा ही योजना ठाकरे सरकारने गुंडाळली (Chanda te Banda scheme close) आहे.

ठाकरे सरकारचा धक्का, युती सरकारच्या काळातील आणखी एक योजना बंद
Follow us
| Updated on: Jan 16, 2020 | 9:13 PM

सिंधुदुर्ग : भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारने सुरु केलेली चांदा ते बांदा ही योजना ठाकरे सरकारने गुंडाळली (Chanda te Banda scheme close) आहे. माजी अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ही योजना बंद केल्याने याचा मोठा फटका सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्याला बसणार आहे.

चांदा ते बांदा या कार्यक्रमास 2016-2017, 2019-2020 या 4 वर्षांच्या कालावधीसाठी राबवण्यास मान्यता दिली होती. या कार्यक्रमास आवश्यकेतनुसार मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर सध्या कोणत्याही नवीन कामांना/ योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये. तसेच ज्या कामांना या पत्रापूर्वी मान्यात दिली आहे अशा कामांचा कार्यारंभ करु नये असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

विविध संसाधनाचा नियोजनबद्ध वापर करण्यासोबतच रोजगाराच्या संधी तसंच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी ‘चांदा ते बांदा’ ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत होती. मात्र ही योजना बंद करावी, असे आदेश ठाकरे सरकारने दिले (Chanda te Banda scheme close) आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिपक केसरकर यांच्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांची कामं या योजनेतून प्रस्तावित करण्यात आली होती. तसेच चंद्रपुर जिल्ह्यातही या योजनेअंतर्गत अनेक कामे सुरू होती. मात्र ही योजना गुंडाळण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तसेच यावरुन शिवसेनेत अंतर्गत संघर्षही निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चांदा ते बांदा ही योजना बंद करु नये अशी मागणी सातत्याने शिवसेनेचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर करत होते. तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनी ही योजना बंद करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती नुकत्याच सिंधुदुर्ग दौऱ्यात दिली होती. मात्र ही योजना गुंडाळण्यात आल्याने याचा मोठा फटका सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्याला बसण्याची शक्यता (Chanda te Banda scheme close) आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.