AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: काँग्रेस, राष्ट्रवादीने मतांचा कोटा वाढवला, अतिरिक्त चार मतांमुळे शिवसेनेचा उमेदवार धक्क्याला लागणार?

Rajya Sabha Election 2022: गेल्या चार दिवसांपासून महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीचे डावपेच ठरवत आहेत. आघाडीच्या आमदारांना दगाफटका होऊ नये म्हणून या आमदारांना तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे.

Rajya Sabha Election 2022: काँग्रेस, राष्ट्रवादीने मतांचा कोटा वाढवला, अतिरिक्त चार मतांमुळे शिवसेनेचा उमेदवार धक्क्याला लागणार?
काँग्रेस, राष्ट्रवादीने मतांचा कोटा वाढवला, अतिरिक्त चार मतांमुळे शिवसेनेचा उमेदवार धक्क्याला लागणार?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2022 | 10:25 AM
Share

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) मतदान सुरू झालं आहे. सर्वच पक्षाच्या आमदारांनी टप्प्याने मतदान करत आहेत. मात्र हे मतदान सुरू झालेलं असतानाच काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीने (ncp) अचानक मतांचा कोटा वाढवला आहे. आपल्या प्रत्येक उमेदवाराला 42 मते द्यायचं ठरलं होतं. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतांचा हा कोटा 44 केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार अडचणीत आला आहे. अचानक दोन्ही पक्षांनी दोन दोन मतांचा कोटा वाढवला आहे. म्हणजे एकूण चार मते अतिरिक्त जाणार असल्याने शिवसेना उमेदवार संजय पवार यांची कोंडी होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे महावविकास आघाडीत मतांच्या कोट्यावरून धुसफूस सुरू झालेली असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुण्याकडे रवाना होत असल्याने चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. तर, मतांचा कोटा वाढवण्यात आल्याची ही अफवा असून भाजपनेच ही बातमी पेरल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

गेल्या चार दिवसांपासून महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीचे डावपेच ठरवत आहेत. आघाडीच्या आमदारांना दगाफटका होऊ नये म्हणून या आमदारांना तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे. तसेच या आमदारांचं प्रशिक्षणही झालं. मतदान कसं करायचं याची माहिती या आमदारांना देण्यात आलं. त्या शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना मतदानाबाबत मार्गदर्शनही केलं होतं.

मतांचं काय ठरलं होतं?

यावेळी प्रत्येक उमेदवाराला 42 मते देण्याचं ठरलं होतं. मात्र, अचानक राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपला मतांचा कोटा वाढवला आहे. हा कोटा 44 केला आहे. मतं बाद होऊन दगाफटका होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. कोणीही मतांचा कोटा वाढवला नाही. ही भाजपने पेरलेली बातमी आहे, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. तर कोणी काही सांगू द्या. मतांचा कोटा वाढलेला नाही. संध्याकाळी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

शरद पवार पुण्याकडे

दरम्यान, आमदारांचं मतदान सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुण्याला रवाना होत आहेत. इकडे आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा असताना पवार पुण्याकडे जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, मतांचा कोटा वाढवल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून काहीही भाष्य करण्यात आलेलं नाही.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.