Rajya Sabha Election 2022: काँग्रेस, राष्ट्रवादीने मतांचा कोटा वाढवला, अतिरिक्त चार मतांमुळे शिवसेनेचा उमेदवार धक्क्याला लागणार?

Rajya Sabha Election 2022: गेल्या चार दिवसांपासून महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीचे डावपेच ठरवत आहेत. आघाडीच्या आमदारांना दगाफटका होऊ नये म्हणून या आमदारांना तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे.

Rajya Sabha Election 2022: काँग्रेस, राष्ट्रवादीने मतांचा कोटा वाढवला, अतिरिक्त चार मतांमुळे शिवसेनेचा उमेदवार धक्क्याला लागणार?
काँग्रेस, राष्ट्रवादीने मतांचा कोटा वाढवला, अतिरिक्त चार मतांमुळे शिवसेनेचा उमेदवार धक्क्याला लागणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 10:25 AM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) मतदान सुरू झालं आहे. सर्वच पक्षाच्या आमदारांनी टप्प्याने मतदान करत आहेत. मात्र हे मतदान सुरू झालेलं असतानाच काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीने (ncp) अचानक मतांचा कोटा वाढवला आहे. आपल्या प्रत्येक उमेदवाराला 42 मते द्यायचं ठरलं होतं. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतांचा हा कोटा 44 केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार अडचणीत आला आहे. अचानक दोन्ही पक्षांनी दोन दोन मतांचा कोटा वाढवला आहे. म्हणजे एकूण चार मते अतिरिक्त जाणार असल्याने शिवसेना उमेदवार संजय पवार यांची कोंडी होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे महावविकास आघाडीत मतांच्या कोट्यावरून धुसफूस सुरू झालेली असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुण्याकडे रवाना होत असल्याने चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. तर, मतांचा कोटा वाढवण्यात आल्याची ही अफवा असून भाजपनेच ही बातमी पेरल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

गेल्या चार दिवसांपासून महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीचे डावपेच ठरवत आहेत. आघाडीच्या आमदारांना दगाफटका होऊ नये म्हणून या आमदारांना तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे. तसेच या आमदारांचं प्रशिक्षणही झालं. मतदान कसं करायचं याची माहिती या आमदारांना देण्यात आलं. त्या शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना मतदानाबाबत मार्गदर्शनही केलं होतं.

हे सुद्धा वाचा

मतांचं काय ठरलं होतं?

यावेळी प्रत्येक उमेदवाराला 42 मते देण्याचं ठरलं होतं. मात्र, अचानक राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपला मतांचा कोटा वाढवला आहे. हा कोटा 44 केला आहे. मतं बाद होऊन दगाफटका होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. कोणीही मतांचा कोटा वाढवला नाही. ही भाजपने पेरलेली बातमी आहे, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. तर कोणी काही सांगू द्या. मतांचा कोटा वाढलेला नाही. संध्याकाळी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

शरद पवार पुण्याकडे

दरम्यान, आमदारांचं मतदान सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुण्याला रवाना होत आहेत. इकडे आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा असताना पवार पुण्याकडे जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, मतांचा कोटा वाढवल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून काहीही भाष्य करण्यात आलेलं नाही.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.