AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… म्हणून विरोधीपक्ष गोंधळलेल्या अवस्थेत : अशोक चव्हाण

विरोधीपक्ष भाजपने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सडकून टीका केली आहे.

... म्हणून विरोधीपक्ष गोंधळलेल्या अवस्थेत : अशोक चव्हाण
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 23, 2020 | 10:47 PM
Share

मुंबई : विरोधीपक्ष भाजपने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सडकून टीका केली आहे (Ashok Chavan criticize BJP). तसेच सरकारच्या चांगल्या निर्णयांमुळे विरोधीपक्षांना काय करावं हेच कळत नाही. त्यामुळेच भाजप गोंधळलेल्या अवस्थेत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या शेती धोरणावरही टीका केली.

अशोक चव्हाण म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारचं काम अगदी व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधीच मिळत नाही. म्हणूनच ते गोंधलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना सरकारच्या चांगल्या कामामुळे कसा फायदा घ्यायचा हेच कळेना. खरंतर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्यापेक्षा इथं येऊन चर्चा करायला हवी होती. मात्र, विरोधी पक्ष स्वतः गोंधलेल्या अवस्थेत आहेत.”

केंद्र सरकारने पीकविमा आता ऐच्छिक केला आहे. केंद्र सरकारने पिकविम्याची रक्कम कमी केली आणि त्याचा काही भार राज्यांवर टाकला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेला असा निर्णय अनपेक्षित आणि चुकीचा आहे. पिकविम्यामुळे शेतकऱ्यांना चांगली आर्थिक मदत व्हावी, आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा ही अपेक्षा असते. मात्र, आता पीकविमा ऐच्छिक केल्याने नव्यानं मुद्दा निर्माण झाला आहे. नैसर्गिक आपत्ती येईल तेव्हा शेतकऱ्यांना पीकविमा कोण देणार? असाही प्रश्न यामुळे तयार झाला आहे. याबाबत आगामी काळात मंत्रिमंडळाला काही धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी उद्या शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी येणार असल्याचंही सांगितलं.

काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) यांच्याविषयी काही मतं आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही घेतली आहे. अद्याप आमच्या समन्वय समितीत यावर चर्चा व्हायची आहे. या चर्चेनंतर स्थिती स्पष्ट होईल, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

Ashok Chavan criticize BJP

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...