AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खामोश!! पहिल्याच रॅलीत ही भाषा शोभत नाही, शत्रुघ्न सिन्हांनी मिथुनला सुनावलं

मिथून यांनी खास आपल्या स्टाईलमध्ये भाषणबाजी केली. पण त्यांच्या याच भाषणावर त्यांचे मित्र, प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेस खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी खडे बोल सुनावले आहेत

खामोश!! पहिल्याच रॅलीत ही भाषा शोभत नाही, शत्रुघ्न सिन्हांनी मिथुनला सुनावलं
| Updated on: Mar 08, 2021 | 7:20 PM
Share

नागपूर : पश्चिम बंगाल निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजप हरप्रकारे प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून तृणमूल काँग्रेसच्या अनेक मोठमोठ्या नेत्यांना भाजपने आपल्या गोटात सामावून घेतलं आहे. त्यात ममतांच्या जीवावर संसदेत पोहोचलेल्या बॉलिवूड अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचाही समावेश आहे. मिथून चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.(Shatrughan Sinha criticizes Mithun Chakraborty’s speech at BJP’s rally in Kolkata)

मिथून यांनी खास आपल्या स्टाईलमध्ये भाषणबाजी केली. पण त्यांच्या याच भाषणावर त्यांचे मित्र, प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेस खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी खडे बोल सुनावले आहेत. सिन्हा आज नागपुरात होते. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला पत्रकारांच्या सत्कार सोहळ्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

‘साप, विंचू, कोब्राची भाषा नको होती’

“मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे चांगलं आहे. ते माझे जवळचे मित्र आहेत. लोकप्रिय व्यक्तीमत्व आहे. मात्र, पहिल्याच रॅलीत त्यांनी साप, विंचू, कोब्राची भाषा बोलायला नको होती. ते राजकीय बोलले असते तर चांगलं झालं असतं”, अशा शब्दात सिन्हा यांनी मिथुन चक्रवर्ती यांना राजकीय सल्लाच देऊ केलाय. “मिथून चक्रवर्ती यांच्या प्रवेशानं भाजपला फायदा होईल असं नाही. त्यांना फायद्यासाठीच भाजपमध्ये आणण्यात आलं. पण असं होऊ नये की उशिरा आणलं. ममता बॅनर्जी मजबूत आहेत. त्यांना हलवणं एवढं सोपं होणार नाही”, असा दावाही शत्रुघ्न सिन्हा यांनी केलाय.

पंतप्रधान मोदींवरही टीका

सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी रॅलीत जे बोलायला हवं होतं ते झालं नाही. त्यांच्या भाषणात मटेरियलची कमी असल्याचं दिसून आलं. आपल्या भाषणात त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला असता तर चांगलं झालं असतं, असंही सिन्हा यांनी म्हटलंय. भाजपची रॅली चांगली झाली. पण ममता बॅनर्जींची रॅली या पेक्षा मोठी होती. मिथुन चक्रवर्ती यांच्यामुळे गर्दी वाढली होती, असा टोलाही सिन्हा यांनी लगावलाय.

मिथुन चक्रवर्ती नेमकं काय म्हणाले?

कोलकाता इथं भाजपच्या रॅलीत बोलताना मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला. मी असली कोब्रा आहे. दंश केला तर तुमचा फोटो घरात लागेल. मी फक्त एक साप नाही, मी क्रोब्रा आहे. एका दंशात संपवून टाकेन, अशा शब्दात मिथुन यांनी तृणमूल काँग्रेसला जणू इशाराच दिलाय. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटातील ‘मारुंगा यहां लाश गिरेगी समशान में’ हा खास डायलॉगही म्हटला. पण हा डायलॉग आता जुना झाला असल्याचंही मिथुन म्हणाले.

संबंधित बातम्या :

कोबरा हूँ… हक छीनेगा तो खड़ा हो जाऊंगा; मिथुन चक्रवतींचा भाजपच्या रॅलीतून हुंकार!

मोदींची पश्चिम बंगालमध्ये रॅली, मिथुन चक्रवर्तींचीही ‘एन्ट्री’; पश्चिम बंगालची हवा बदलणार?

Shatrughan Sinha criticizes Mithun Chakraborty’s speech at BJP’s rally in Kolkata

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.