BMC Elections | काँग्रेसचं कन्फ्युजन, आधी एक नेता म्हणतो सेनेसोबत युतीची गरज नाही, दुसरा म्हणतो, एकत्रच लढू

आघाडीत निवडणूक लढवण्याची‌ आमची‌ मानसिकता आहे" अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली

BMC Elections | काँग्रेसचं कन्फ्युजन, आधी एक नेता म्हणतो सेनेसोबत युतीची गरज नाही, दुसरा म्हणतो, एकत्रच लढू
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 7:09 PM

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) एकट्याने लढायची की महाविकास आघाडीसोबत ‌‌(Maha Vikas Aghadi), याबद्दल काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांनी पालिका निवडणूक महाविकास आघाडीत लढण्याची तयारी दर्शवली आहे, तर मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेते रवी राजा (Ravi Raja) यांना मात्र स्वबळाची खुमखुमी आहे. (Congress Leaders in confusion over contesting BMC Election 2022 alone or alliance)

“आम्ही बीएमसी इलेक्शन महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू. समाधानकारक जागा‌ मिळाल्या तर आमची आघाडी राहील, पण आघाडीत निवडणूक लढवण्याची‌ आमची‌ मानसिकता आहे” अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली. “मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याबाबत जर कोणी म्हणत असेल, तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे” असंही एकनाथ गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

“मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल, शिवसेनेसोबत युती करण्याची काहीही गरज नाही” असं वक्तव्य मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी केलं होतं. याचं कारण म्हणजे काँग्रेसच्या महापालिकेतील गोटात काही अंशी शिवसेनेबद्दल नाराजीही आहे. आम्हाला शिवसेना विश्वासात घेत नाही म्हणून महापालिकेत राज्यासारखी महाविकास आघाडी होऊ शकली नाही, अशी नाराजी रवी राजा यांनी याआधीही बोलून दाखवली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायीसह इतर समिती निवडणुकात काँग्रेस सत्ताधारी सेनेविरोधात मैदानातही उतरली होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने माघार घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.

थोरातांकडून महाविकास आघाडीचे संकेत

मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवू शकते. लवकरच एकत्र बैठक घेऊ. त्यामुळे साहजिकच आमच्या जागा वाढतील, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी आजच केला होता. त्यानंतर रवि राजांनी परस्पर विरोधी मत मांडत ट्विस्ट आणला. एकाच दिवसात तीन नेत्यांची मतांतरं दिसल्याने पक्षात कन्फ्युजन असल्याचं बोललं जात आहे.

2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच शड्डू ठोकला आहे. भाजपने आधीच स्वबळाचा नारा दिला आहे. आता सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे हे इतर चार प्रमुख पक्ष कसे रिंगणात उतरणार, याची उत्सुकता आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

  • शिवसेना – 92
  • भाजप – 82
  • काँग्रेस – 30
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 9
  • समाजवादी पक्ष– 6
  • एमआयएम – 2
  • मनसे – 1
  • अभासे – 1

संबंधित बातम्या :

बीएमसी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार, मनसेबाबत विचार करु : प्रवीण दरेकर

मुंबईचा गड जिंकण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी; फडणवीस- चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक

‘बीएमसी’ निवडणुकीत शिवसेनेशी युती नको, काँग्रेस स्वबळावर : रवी राजा

(Congress Leaders in confusion over contesting BMC Election 2022 alone or alliance)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.