काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे; नाना पटोलेंकडून महाविकास आघाडीला आठवण!

काँग्रेसच्या आमदारांना निधी कमी दिला जात असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आठवण करुन दिली आहे.

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे; नाना पटोलेंकडून महाविकास आघाडीला आठवण!
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 3:22 PM

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्वकाही आलबेल सुरु असल्याचं सांगितलं जातं. किमान समान कार्यक्रमावर सरकार योग्यरित्या काम करत असल्याचं बोललं जातं. पण गेल्या काही दिवसांत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यात आता काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही समावेश आहे. काँग्रेसच्या आमदारांना निधी कमी दिला जात असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आठवण करुन दिली आहे.(Congress state president Nana Patole’s displeasure over MLA funds)

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे. जिथे कमी तिथे बोललं तर काय चुकलं. समान वाटप व्हावं ही आमची मागणी आहे, असं नाना पटोले म्हणाले. यापूर्वी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही काँग्रेस आमदारांना मिळणाऱ्या निधीबाबत नाराजी व्यक्त केली होती.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरुन केंद्र सरकारवर टीका

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना केंद्रातील भाजप सरकार पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवून जनतेची लूट करत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात रस्ते विकासासाठी पेट्रोल-डिझेलवर 1 रुपया सेस लावून रस्ते चांगलं करण्याचं काम सुरु होतं. मनमोहन सिंग यांनीही हा सेस चालू ठेवला. पण मोदी सरकारने हा सेस 18 रुपये केला आहे. यात शेती विकासासाठी 4 रुपये सेस लावला आहे. शेतकऱ्यांसाठी हे सरकार काय काम करतंय? उलट शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय.

देशातील सगळे टोल बंद करा- पटोले

जनतेची डबल लूट सुरु आहे. रस्त्यासाठी पेट्रोलवर सेस घेतला जातो आणि टोलही आकारला जातो. देशातील सगळे टोळ तात्काळ बंद करावे अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे. 2015 मध्ये राज्यातील फडणवीस यांच्या सरकारच्या काळात 25 टक्के पेट्रोल, तर डिझेलमध्ये 21 टक्के वाढ केली. त्यांचे सरकार जाईपर्यंत 11 रुपयांची वाढ केली. पण महाविकास आघाडी सरकारने फक्त 1 रुपयाची वाढ केल्याचा दावा पटोले यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

मुंबईत महागाईचा भडका, पेट्रोलची वाटचाल शतकाकडे; वाचा आजचे दर

धनंजय मुंडेंनी काय देऊन प्रकरण सेटलं केलं, हे त्यांनाच ठाऊक: निलेश राणे

Congress state president Nana Patole’s displeasure over MLA funds

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.