AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress Upset | निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेस नाराज, स्वतंत्र बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही.निर्णय प्रक्रियेत घेत नाही, यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. (Congress Upset in Maha Vikas aaghadi)

Congress Upset | निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेस नाराज, स्वतंत्र बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
| Updated on: Jun 11, 2020 | 2:59 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडीतील तीन पक्षांमधील कुरबुऱ्या सुरुच असल्याचं चित्र आहे. निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतलं जात नसल्याने काँग्रेस नाराज आहे. काँग्रेसने आज बैठक घेऊन त्याबाबत चर्चा केली. मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री वर्षा गायकवाड, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे कोरोनावर मात करुन आलेले अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच या बैठकीला हजेरी लावली. (Congress Upset in Maha Vikas aaghadi)

काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही. निर्णय प्रक्रियेत घेत नाही, यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे.

या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना या बैठकीबाबतची माहिती दिली. थोरात म्हणाले “राज्याचे काही प्रश्न घेऊन आम्ही एकत्र बसलो होतो. चक्रीवादळ झालं, त्या पाहणीसाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार गेले होते. सरकार म्हणून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. आम्ही ते मांडणार आहोत. आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्या काही मागण्या आहेत. साहजिकच काही प्रश्न आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला सामील करणयाचा प्रश्न आहे, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत”

महाविकास आघाडीचेही काही प्रश्न आहेत, त्यावर चर्चा झाली. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असं थोरात यांनी सांगितलं. (Congress Upset in Maha Vikas aaghadi)

महाविकास आघाडीतील काँग्रेस हा घटकपक्ष आहे. आम्ही 12 मंत्री आहोत. राज्याचे काही विषय घेऊन चर्चा झाली. कोरोना संकट, वादळ आहे. पालकमंत्री, संपर्कमंत्री यांची चर्चा झाली. सरकार म्हणून आमची चर्चा झाली, असं थोरात म्हणाले.

आम्ही ज्यावेळी एकत्र बसतो, त्यावेळी आमच्या चर्चा होतात. आमच्या अपेक्षा साहजिकच सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांकडून आहेत. त्याबाबतही चर्चा झाली. आम्ही घटकपक्ष आहोत. सरकार तीन पक्षांचं आहे. एकट्या पक्षाच्याही चर्चा होतात. आमच्या मागण्या आहेत त्या महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत, आमच्या वैयक्तिक मागण्या नाहीत, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

सोनियांच्या आग्रहानंतर माजी पंतप्रधान पुन्हा रिंगणात, 87 व्या वर्षी राज्यसभा उमेदवारी

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.