AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: शरद पवार साहेबांना धमकी देण्या इतपत माज वाढलाय, संजय राऊतांनी राणेंच्या भाषेवर बोट ठेवलं, मोदी-शहांना थेट सवाल?

नारायण राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार संजय राऊत यांनी घेतला आहे. पवारांच्या वयाचा, त्यांच्या पदाचा मान ठेवता येत नसेल तर आपण मराठी म्हणून घ्यायला देखील नालायक आहोत असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut: शरद पवार साहेबांना धमकी देण्या इतपत माज वाढलाय, संजय राऊतांनी राणेंच्या भाषेवर बोट ठेवलं, मोदी-शहांना थेट सवाल?
संजय राऊत
| Updated on: Jun 24, 2022 | 10:24 AM
Share

मुंबई: राज्यात सत्ता बदलाचे संकते मिळू लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. गुरुवारी नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणे यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.  शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही, असं धमकी देणारं कुणी राज्यात असेल तर त्याचा विचार हा मोदी शहांना करावा लागेल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पवारांच्या वयाचा, त्यांच्या पदाचा मान ठेवता येत नसेल तर आपण मराठी म्हणून घ्यायला देखील नालायक आहोत असेही राऊत यांनी म्हटले आहे. पवारांवर केलेल्या टीकेवरून संजय राऊत यांनी नारायन राणेंना जोरदार टोला लगावला आहे.

नाराणय राणे यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

भाजप नेते नारायण राणे यांनी दोन ट्विट केले होते. या दोन ट्विटमधून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. ”आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काही जणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही’. माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.” असे नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. या ट्विटचा आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

‘शिवसेनेचा आकडा कमी झाला’

दरम्यान यावेळी बोलताना शिवसेनेकडे असलेल्या आमदारांचा आकडा कमी झाल्याचे देखील संजय राऊत यांनी मान्य केले आहे. शिवसेनेकडे असलेल्या आमदारांचा आकडा कमी झाला आहे. लोकशाहीमध्ये बहुमत हे आकड्यांवर अवलंबून असते. मात्र हा आकड्यांचा खेळ फार चंचल असतो. ज्या दिवशी हे आमदार मुंबईत येतील, त्यादिवशी आमदारांच्या निष्ठेची बाळासाहेबांवर भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल. जेव्हा बहुमताचा विषय सभागृहात जाईल तेव्हाच सर्व चित्र स्पष्ट होईल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.