AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मांतर करणाऱ्यांना आरक्षण… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेमकी मागणी काय?

लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वांना लागू होईल असं धोरण तयार केलं पाहिजे. आम्ही यापूर्वीही ही मागणी केली आहे. तसेच जे लोक धर्मांतर करतात त्यांना आरक्षणाचा लाभ देऊ नये.

धर्मांतर करणाऱ्यांना आरक्षण... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेमकी मागणी काय?
धर्मांतर करणाऱ्यांना आरक्षण... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेमकी मागणी काय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2022 | 1:11 PM
Share

प्रयागराज: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (rss) पुन्हा एकदा देशातील लोकसंख्येच्या असमतोलावर चिंता व्यक्त केली आहे. लोकसंख्येच्या धोरणावर (population policy) समग्र विचार केला गेला पाहिजे. सर्वांना लागू होईल, असं लोकसंख्या धोरण लागू केलं पाहिजे, अशी मागणी करतानाच धर्मांतरामुळे हिंदुंची लोकसंख्या घटत आहे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे (Dattatreya Hosabale) यांनी व्यक्त केलं आहे. तसेच धर्मांतर करणाऱ्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणीही दत्तात्रय होसबळे यांनी केली आहे.

यापूर्वी विजया दशमीच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्याच्या असमतोलावर चिंता व्यक्त केली होती. संपूर्ण देशातील जनतेला लागू होईल, असं लोकसंख्या धोरण आखण्याची गरज असल्याचं मोहन भागवत म्हणाले होते. त्यानंतर होसबळेयांनी आज या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

प्रयागराजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार दिवशीय अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर मीडियाशी बोलताना दत्तात्रय होसबळे यांनी हा पुनरुच्चार केला. धर्मांतरामुळे हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. देशातील अनेक भागात धर्मांतर सुरू आहे. काही सीमावर्ती भागात घुसखोरी होत आहे. लोकसंख्येच्या असमतोलामुळे अनेक देश फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. भारताची फाळणीसुद्धा लोकसंख्येच्या असमतोलामुळे झालं आहे, असं ते म्हणाले.

लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वांना लागू होईल असं धोरण तयार केलं पाहिजे. आम्ही यापूर्वीही ही मागणी केली आहे. तसेच जे लोक धर्मांतर करतात त्यांना आरक्षणाचा लाभ देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीमुळे लोकसंख्येचा असमतोल झाला आहे. उत्तर बिहार, पूर्वोत्तर राज्य आणि दुसऱ्या राज्यात बांगलादेशींची घुसखोरी पाहायला मिळत आहे, असं ते म्हणाले. तसेच धर्मांतराच्या विरोधात तयार करण्यात आलेल्या कायद्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....