AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मांतर करणाऱ्यांना आरक्षण… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेमकी मागणी काय?

लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वांना लागू होईल असं धोरण तयार केलं पाहिजे. आम्ही यापूर्वीही ही मागणी केली आहे. तसेच जे लोक धर्मांतर करतात त्यांना आरक्षणाचा लाभ देऊ नये.

धर्मांतर करणाऱ्यांना आरक्षण... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेमकी मागणी काय?
धर्मांतर करणाऱ्यांना आरक्षण... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेमकी मागणी काय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2022 | 1:11 PM
Share

प्रयागराज: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (rss) पुन्हा एकदा देशातील लोकसंख्येच्या असमतोलावर चिंता व्यक्त केली आहे. लोकसंख्येच्या धोरणावर (population policy) समग्र विचार केला गेला पाहिजे. सर्वांना लागू होईल, असं लोकसंख्या धोरण लागू केलं पाहिजे, अशी मागणी करतानाच धर्मांतरामुळे हिंदुंची लोकसंख्या घटत आहे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे (Dattatreya Hosabale) यांनी व्यक्त केलं आहे. तसेच धर्मांतर करणाऱ्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणीही दत्तात्रय होसबळे यांनी केली आहे.

यापूर्वी विजया दशमीच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्याच्या असमतोलावर चिंता व्यक्त केली होती. संपूर्ण देशातील जनतेला लागू होईल, असं लोकसंख्या धोरण आखण्याची गरज असल्याचं मोहन भागवत म्हणाले होते. त्यानंतर होसबळेयांनी आज या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

प्रयागराजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार दिवशीय अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर मीडियाशी बोलताना दत्तात्रय होसबळे यांनी हा पुनरुच्चार केला. धर्मांतरामुळे हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. देशातील अनेक भागात धर्मांतर सुरू आहे. काही सीमावर्ती भागात घुसखोरी होत आहे. लोकसंख्येच्या असमतोलामुळे अनेक देश फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. भारताची फाळणीसुद्धा लोकसंख्येच्या असमतोलामुळे झालं आहे, असं ते म्हणाले.

लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वांना लागू होईल असं धोरण तयार केलं पाहिजे. आम्ही यापूर्वीही ही मागणी केली आहे. तसेच जे लोक धर्मांतर करतात त्यांना आरक्षणाचा लाभ देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीमुळे लोकसंख्येचा असमतोल झाला आहे. उत्तर बिहार, पूर्वोत्तर राज्य आणि दुसऱ्या राज्यात बांगलादेशींची घुसखोरी पाहायला मिळत आहे, असं ते म्हणाले. तसेच धर्मांतराच्या विरोधात तयार करण्यात आलेल्या कायद्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.