AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शेतकर्‍यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जातं’, बिलोलीतून फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

बिलोलीमधील सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'योजना बंद आणि वसुली सुरु, हे चालू लोकांचं चालू सरकार आहे. शेतकऱ्यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जात आहेत', असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

'शेतकर्‍यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जातं', बिलोलीतून फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 5:31 PM
Share

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका लावला. बिलोलीमधील सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘योजना बंद आणि वसुली सुरु, हे चालू लोकांचं चालू सरकार आहे. शेतकऱ्यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जात आहेत’, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय. (Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government for Farmers issue)

राज्याच्या तिजोरीत पैसा आहे, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये नियत नाही. कोरोनाच्या कालखंडात एकाही घटकाला त्यांनी मदत केली नाही. लोक जगत आहेत की मरत आहेत यांची पर्वा त्यांनी केली नाही. हे महाविकास आघाडी सरकार जनविरोधी आहे. यांनी मराठा, ओबीसी सगळ्यांचं आरक्षण घालवलं. मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बंद केलं. पण, मराठवाड्यातील एकही मंत्री बोलला नाही. हा साझा विषय नाही. पुढच्या अनेक पिढ्यांच्या तोंडचा विकास पळवून नेण्याचा हा प्रकार आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं.

‘राज्यात केवळ बंद सरकार’

तत्पूर्वी नांदेडच्या कुंडलवाडी इथं बोलताना फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारनं बंद केलेल्या योजनांचा पाढाच वाचला. राज्यातील सरकारची 2 वर्षातील उपलब्धी काय? जलयुक्त शिवार बंद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बंद, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद, स्मार्ट योजना बंद, ड्रीप इरिगेशन बंद, रस्त्यांची कामे बंद, धरणांची कामे बंद, शेतकऱ्यांचा विमा, वीज बंद, शेतकऱ्यांना मदत बंद, राज्यात केवळ बंद सरकार उरलं असल्याचा घणाघात फडणवीस यांनी केला.

‘बायकोनं मारलं तर केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’

महाविकास आघाडीतील लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था वाईच आहे. अतिवृष्टीत मोठं नुकसान झालं पण या सरकारने रुपयांची मदत केली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पण यांचे पैसे सरकारला मिळत नाहीत. पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे इतके लबाड आहेत की काहीही झालं की केंद्रावर ढकलतात. बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं असं सांगतील, अशी खोचक टीका फडणवीसांनी केलीय.

इतर बातम्या :

बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक हवा, चंद्रकांत पाटलांचं मत; 2 लाखाच्या मदतीची घोषणा

प्रभाकर साईलला पोलिस संरक्षण, सर्व पुरावे क्राईम ब्रँचकडे; समीर वानखेडेंवर मुंबई पोलिस कारवाई करणार?

Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government for Farmers issue

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.