AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कुठंतरी पाणी मुरतंय त्यामुळेच रवी राणांनी आरोप केले’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याने केली चौकशीची मागणी

आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वादात आता विरोधकांनी देखील उडी घेतल्याचं पहायला मिळत आहे.

'कुठंतरी पाणी मुरतंय त्यामुळेच रवी राणांनी आरोप केले'; ठाकरे गटाच्या 'या' नेत्याने केली चौकशीची मागणी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2022 | 10:32 AM
Share

औरंगाबाद :  आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वादात आता विरोधकांनी देखील उडी घेतल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांकडून या वादाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारवर टीका करण्यात येत आहे. कोणाला किती खोके पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भाडंण सुरू झाल्याचा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील या वादावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. कुठेतरी पाणी मुरतंय, त्यामुळेच रवी राणा यांनी आरोप केल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

दानवेंचा टोला

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी खोचक टोला लगावला आहे. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, कुठेतरी पाणी मुरतंय, त्यामुळेच रवी राणा यांनी आरोप केले असतील असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. त्यांनी या सर्व प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना जोरदार टोला लगावला आहे. आता दानवे यांच्या टीकेला शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

दरम्यान रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यस्थी करणार आहेत. आज रवी राणा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे बच्चू कडू यांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटण्यासाठी बोलावले आहे. दोन्ही आमदारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये अशा सूचना देखील वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.