AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यात काही बदलायची संधी मिळाली, तर पहाटेचा शपथविधी बदलाल का? फडणवीस म्हणतात…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतकार राजू परुळेकर यांनी मुलाखत (Devendra Fadnavis interview with Raju Parulekar) घेतली.

आयुष्यात काही बदलायची संधी मिळाली, तर पहाटेचा शपथविधी बदलाल का? फडणवीस म्हणतात...
| Updated on: Jun 23, 2020 | 3:56 PM
Share

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतकार राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी राजू परुळेकरांनी फडणवीसांना जर तुम्हाला काही बदलायची संधी मिळाली तर तुम्ही काय बदलाल किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधी बदलाल का? असा प्रश्न विचारला. (Devendra Fadnavis interview with Raju Parulekar Talk About oath ceremony with Ajit Pawar)

या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “जीवनात अशा 100 घटना असतात, ज्या आपल्याला बदलल्या पाहिजेत असं वाटतं. पण त्या 100 घटना आपण बदलू शकत नाही. त्यामुळे हे बदलेन किंवा ते बदलेन हे निवडणं कठीण आहे.”

“जर संधी मिळाली तर माझ्या स्वत: मध्ये मला एक बदल करायचा आहे. कदाचित ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. माणसाला एक महत्त्वाकांक्षा लागते आणि त्यासाठी एक Killer Instinct (काही तरी करुन दाखवण्याची वृत्ती) लागते. ती माझ्यात नाही. मला कपटी क्रूर व्हायचं नाही. तसा मी नाही, हे त्यांनाही माहिती आहे. पण मला नेहमी अस वाटतं की मला हे मिळवायचे आहे किंवा ते माझ्या जीवनात नाही. हे केवळ सत्तेसाठी नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मी अल्पसंतुष्ट आहे. अल्पसंतुष्ट असण्याचे फायदेही असतात. मानसिक त्रास होत नाही. पण त्याचं नुकसान असतं. मी जे करु शकलो, तेही चांगलं करु शकलं. पण यापेक्षा चारपट करु शकतो,” असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

“मी पंतप्रधान होईन असं वाटत नाही. जेव्हा मी नगरसेवक, महापौर होतो, तेव्हा मी बदल केलेत. आमदार किंवा मुख्यमंत्री होतो, तेव्हाही मला जे करता आलं ते मी केलं. आता विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे आताही मला जे शक्य आहे ते करतो. जो रोल मला मिळाला किंवा जीवनात जी भूमिका मिळाली त्या भूमिकेला आपल्या क्षमतेप्रमाणे न्याय द्यायचा प्रयत्न करायचा,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis interview with Raju Parulekar Talk About oath ceremony with Ajit Pawar)

संबंधित बातम्या : 

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबाबतचा इंटरेस्ट वाढला, त्यांच्याशी दोन मुद्द्यावर पटू शकतं : देवेंद्र फडणवीस

सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवार

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.