AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्यावरील निर्यातबंदी मागे घ्यावी, उदयनराजेंनंतर फडणवीसांची पियुष गोयलना विनंती

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे

कांद्यावरील निर्यातबंदी मागे घ्यावी, उदयनराजेंनंतर फडणवीसांची पियुष गोयलना विनंती
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Sep 16, 2020 | 4:24 PM
Share

मुंबई : भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता (Devendra Fadnavis Letter To Piyush Goyal) भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनींही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे (Devendra Fadnavis Letter To Piyush Goyal).

देवेंद्र फडणवीस पत्रात काय म्हणाले?

“मी याआधी आपल्याशी याविषयावर संवाद साधला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की निर्यातबंदी तात्काळ उठवावी. महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना योग्य भावही मिळतो. निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकरी हताश, निराश झाले आहे. मी आशा करतो की तुम्ही लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्याल”, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी या पत्रातून पियुष गोयल यांना केली.

भाजप नेत्यांकडून केंद्र सरकारला बंदी उठवण्याची मागणी

भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनीही कांदा निर्यातीवरील बंदी त्वरित उठवावी अशी मागणी केली. पियुष गोयल यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली (Devendra Fadnavis Letter To Piyush Goyal).

त्यापूर्वी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही भाजप सरकारला घरचा अहेर दिला. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे पत्रक काढून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे

त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आपल्याच मोदी सरकारला पत्र लिहित कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेते शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं दिसून येत आहे.

Devendra Fadnavis Letter To Piyush Goyal

संबंधित बातम्या :

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, विनायक मेटेंची विनंती

मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत