सह्याद्रीचं पाणी आणल्यास दुष्काळ संपेल, या सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय : देवेंद्र फडणवीस

जर मराठवाड्यात सह्याद्रीचे पाणी आणले तर दुष्काळ संपू शकतो," असेही फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On criticism Thackeray Government)

सह्याद्रीचं पाणी आणल्यास दुष्काळ संपेल, या सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 11:40 AM

औरंगाबाद : “महाविकासआघाडी सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा नाही. मराठवाडा आणि विदर्भाला पैसे देण्याचे राज्यपालांचे बंधन या सरकारने संपवले आहे. त्यामुळे या सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय झाला आहे,” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. “जर मराठवाड्यात सह्याद्रीचे पाणी आणले तर दुष्काळ संपू शकतो,” असेही फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On criticism Thackeray Government)

विधानसभेच्या पदवीधर निवडणुकीसाठी औरंगाबादेतील प्रचारसभेदरम्यान फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर समाजसेवक, संस्थचालक यांसारख्या प्रतिष्ठित मतदारांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी फडणवीसांनी प्रतिष्ठित मतदारांशी संवाद साधला.

“ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा नाही. मराठवाडा आणि विदर्भाला पैसे देण्याचे राज्यपालांचे बंधन या सरकारने संपवले आहे. त्यामुळे मराठवाड्यावर अन्याय  होत आहे. जर मराठवाड्यावर अन्याय झाला तर त्यांना मतदार सोडणार नाही हे या निवडणुकीतून दाखवून दिलं पाहिजे,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

“मराठवाडा आणि विदर्भाचं चित्र बदलल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही. केंद्राच्या निधीतून विकास केला. यावेळी मराठवाड्याशी संबंधित दोन योजना दिल्या. यात मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना केली. पण या योजनेला ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे काम ठप्प झाले आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली.

“समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी बकेटमध्ये आणण्यासाठी योजना केली. त्यासाठी निधीची तरतूद केली. पण तेही काम बंद पडलेलं आहे. मराठवाड्यात दुष्काळामुळे शेतकरी आणि इंडस्ट्रीवर परिणाम होतो. सह्याद्रीचे पाणी आणले तर दुष्काळ संपू शकतो,” असेही फडणवीस म्हणाले.

“औरंगाबादला आम्ही 1680 कोटी पाण्यासाठी दिले. या शहरातील रस्त्यांसाठी खूप निधी दिला. आता रस्ते तयार झाले आहेत. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली,” असा टोलाही फडणवीसांनी लगावला.(Devendra Fadnavis On criticism Thackeray Government)

संबंधित बातम्या : 

बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं पण…, मनसेचे जोरदार टीकास्त्र

ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाही, बाळासाहेबांचे नाव दिल्याने समृद्धी महामार्गाचे काम सुरु : फडणवीस

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.