AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राहुल गांधींचा ‘तो’ विचार गाडल्याशिवाय राहणार नाही!”, देवेंद्र फडणवीस आक्रमक

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना इशारा दिलाय. वाचा...

राहुल गांधींचा 'तो' विचार गाडल्याशिवाय राहणार नाही!, देवेंद्र फडणवीस आक्रमक
| Updated on: Nov 17, 2022 | 12:52 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विनायक सावरकर यांच्याबाबत विधान केलंय. त्याला आता कडाडून विरोध होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलीय.”स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही”, अशा शब्दात फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधी यांना इशारा दिलाय.

सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय. ज्या विचारांनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, तो विचार आम्ही मरु देणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणालेत.

हिंगोलीत राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करणारं विधान केलं आणि आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत पदयात्रा करतात. हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

रणजीत सावरकर तक्रार करणार

राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावर आक्षेप घेण्यात आला आहे.सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर पोलिसात तक्रार करणार आहेत. मुंबईतील दादर पोलीस स्टेशनमध्ये रणजीत सावरकर तक्रार दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळेदेखील उपस्थित असणार आहेत.

उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

सावरकरांचं देशासाठीचं योगदान अमुल्य आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार काल, आज आणि उद्याही आम्हाला आदरणीय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदरच आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.