AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते’ 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत कसे गेले त्याची संपूर्ण कहाणी, महाराष्ट्रातील महाबंडाची गोष्ट…

महाराष्ट्रातील महाबंडाची गोष्ट...

'ते' 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत कसे गेले त्याची संपूर्ण कहाणी, महाराष्ट्रातील महाबंडाची गोष्ट...
| Updated on: Dec 22, 2022 | 4:36 PM
Share

मुंबई : राजकारणात वेगाने होणाऱ्या बदलांचा दाखला द्यायचा असेल तर अनेकदा बिहारच्या राजकारणाचा दाखला दिला जातो. पण आता हे उदाहरण देताना महाराष्ट्र्चा दाखला (Mahatrashtra Politics) दिला जाऊ शकतो. राज्याच्या राजकारणात या वर्षी घडलेली एक घटना सर्वाधिक चर्चेत राहिली. ती घटना म्हणजे राज्यातील सत्तांतर! या घटनेने राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व बदल (Eknath Shinde Rebellion) झाले. त्याचंच हे सविस्तर वृत्त…

तारीख होती 20 जून. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागला होता. निवडणुकीत जिंकलेल्यांचा जल्लोष सुरू होता. त्यात नेते-कार्यकर्ते व्यस्त होते. अशातच शिवसेनेच्या गोटात मात्र वेगळाच गोष्टी घडत होत्या. शिवसेनेचे नेते मोठ्या बंडाच्या तयारीला लागले होते.

राज्याच्या राजकारणातील अभूतपूर्व बदलांसह 21 जूनचा दिवस उजाडला. आधी एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या आल्या. एकनाथ शिंदेंशी संपर्क होत नाहीये त्यांनी बंड केलंय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. मग हळूहळू ही बातमी अधिक व्यापक होऊ लागली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अन्य आमदारही होते.एव्हाना एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचं स्पष्ट झालं होतं.

एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतला गेले. तिथे हॉटेलमध्ये हे सगळे आमदार थांबले होते. उर्वरित आमदारांपैकी एक एक आमदार सूरतला जात या बंडात सामील होत होता.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारासह आपला मोर्चा गुहावाटीला हलवला. तिथेही आणखी काही आमदार या बंडात सामील झाले. पुढे हे आमदार गोवामार्गे मुंबईत आले. बहुमत सिद्ध केलं.

सगळ्या महाराष्ट्राला माहिती होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. पण सगळ्यांचा अंदाज चुकवत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. अन् सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

अन् सगळ्याचा अंदाज चुकवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुपख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शरद पवार यांनी पुलोद सरकार सत्तेत आणलं त्यानंतर राज्यात झालेलं हे मोठं बंड होतं. या बंडाचा दाखला पुढचे अनेकवर्ष राज्यासह देशाच्या राजकारणात दिला जाणार आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.