AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाहांना पत्र लिहून माजी मुख्यमंत्र्याचा भाजपला रामराम

इटानगर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ईशान्य भारतात मोठा धक्का बसलाय. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी राजीनामा दिलाय. भाजप सत्तेसाठी वाट्टेल ते करत आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तत्त्वाचा भाजपला विसर पडलाय, असं पत्र त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलंय. पक्ष फक्त सत्ता […]

अमित शाहांना पत्र लिहून माजी मुख्यमंत्र्याचा भाजपला रामराम
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM
Share

इटानगर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ईशान्य भारतात मोठा धक्का बसलाय. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी राजीनामा दिलाय. भाजप सत्तेसाठी वाट्टेल ते करत आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तत्त्वाचा भाजपला विसर पडलाय, असं पत्र त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलंय.

पक्ष फक्त सत्ता मिळवण्याचं व्यासपीठ बनलंय. हा पक्ष एका अशा नेत्याच्या हातात आहे, जो विकेंद्रीकरण आणि लोकशाही पद्धतीने निर्णय प्रक्रियेचा विरोध करत होता. या मूल्यांना त्याने कधीही मानलं नाही, असंही अपांग यांनी पक्ष नेतृत्त्वाला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

अरुणाचल प्रदेशात भाजपला 2014 मध्ये लोकांनी नाकारलं होतं. पण जनादेशाच्या विरोधात जाऊन भाजपने पैशांचा वापर केला आणि घोडेबाजार केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही भाजपने अरुणाचल प्रदेशात सत्ता स्थापन केली आणि दिवंगत कालिखो पुल यांना मुख्यमंत्री केलं, असा गंभीर आरोपही अपांग यांनी केलाय.

कालिखो यांच्या आत्महत्येची चौकशी न केल्याबद्दलही अपांग यांनी नाराजी व्यक्त केली. भाजप नेतृत्त्वाने ईशान्य भारतातील इतर राज्यात सत्ता स्थापन करताना जी पद्धत वापरली, ती आवडली नसल्याचंही अपांग यांनी पत्रात म्हटलंय.

अपांग यांनी वाजपेयींची आठवत काढत भाजपवर ताशेरे ओढले आहेत. वाजपेयींनी नेहमी एकतेवर विश्वास ठेवला आणि राजधर्म शिकवला. ते एक महान नेते होते. आज त्यांनी शिकवलेल्या राजधर्माचंच पालन करतोय, असं म्हणत अपांग यांनी राजीनामा दिला.

गेगांग अपांग सात वेळा आमदार आणि 23 वर्ष अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या केवळ दोन जागा असल्या तरी एकूण ईशान्य भारताचा विचार करता हा मोठा धक्का आहे. हे पत्र तुमच्या माहितीसाठी लिहित आहे आणि यावर काहीतरी कार्यवाही कराल अशी अपेक्षा ठेवतो, असंही अपांग यांनी म्हटलंय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...