AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : राज्यपालांचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची सूचना

आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. त्यात बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश राज्यपाल कोश्यारी यांनी दिले आहेत.

Eknath Shinde : राज्यपालांचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची सूचना
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 26, 2022 | 3:40 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तसंच शिवसेनेच्या नेत्यांकडूनही धमकीवजा इशारा दिला जातोय. राज्यात विविध ठिकाणी आमदारांच्या कार्यालयावर हल्ले होत आहेत. अशावेळी बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण (Security) पुरवण्याची मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. त्यात बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश राज्यपाल कोश्यारी यांनी दिले आहेत.

15 बंडखोर आमदारांना केंद्राची Y+ सुरक्षा

दरम्यान, काही वेळापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार बंडखोर आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील बंडाळी मोडण्यासाठी शिवसैनिक कायदा हातात घेतली अशी एकंदरीत घटना आणि घडामोडींवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे गुवाहाटी येथे असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार ही धास्तावले आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार सरसावले आहे. त्यांनी तातडीने या 15 बंडोबांना वाय प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. त्यामुळे आता या स्टोरीत आणखी एक ट्विस्ट आला आहे. गद्दारांना धडा शिकवण्याचा शिवसेनेचा इतिहास आहे, त्यामुळे केंद्र सरकारने या आमदारांना तगडी सुरक्षा प्रदान केली आहे. त्यांनी या 15 आमदारांना Y+ सुरक्षा प्रदान केली आहे.

सुरक्षा काढल्याचा आरोप खोटा – गृहमंत्री

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांचं संरक्षण महाविकास आघाडी सरकारने काढल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. या आमदारांची कोणत्याही प्रकारची सुरक्षा काढलेली नाही, असं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे. शनिवारी सकाळीच बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी 37 आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सादर केलं. यात महाविकास आघाडी सरकारने आमची आणि आमच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेतली आहे. केवळ राजकीय आकसापोटी असं राजकारण केलं जात असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय. ट्विटरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला. मात्र एकनाथ शिंदेंचे आरोप खोटे असल्याचा दावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलाय.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.