AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संजय राऊत यांनी हलकट सारखं सांगितलं निघून जा, मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात’, गुलाबराव पाटलांची जाहीर नाराजी, ठाकरेंवरही टीका

शेवटी नेत्यानेही कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे, पण आमचं म्हणणं उद्धव ठाकरेंनी ऐकून घेतलं नाही. माझ्या वैयक्तिक प्रश्न नव्हता पण पहिल्यांदा आमदार झालेल्यांची अडचण होती, म्हणून आमदारांनी उठाव केला, असं दावा पाटील यांनी केलाय.

'संजय राऊत यांनी हलकट सारखं सांगितलं निघून जा, मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात', गुलाबराव पाटलांची जाहीर नाराजी, ठाकरेंवरही टीका
गुलाबराव पाटीलImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jul 23, 2022 | 11:06 PM
Share

जळगाव : शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर उद्धव ठाकतरे, संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे यांनी पाटलांवर जोरदार टीकाही केली. त्या टीकेला आता गुलाबराव उत्तरं देताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी हलकट सारखं सांगितलं निघून जा, मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात, अशा शब्दात पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. शेवटी नेत्यानेही कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे, पण आमचं म्हणणं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ऐकून घेतलं नाही. माझ्या वैयक्तिक प्रश्न नव्हता पण पहिल्यांदा आमदार झालेल्यांची अडचण होती, म्हणून आमदारांनी उठाव केला, असं दावा पाटील यांनी केलाय.

संजय राऊतांची टीका, गुलाबरावांचं प्रत्युत्तर

गुलाबराव पाटलांनी यापूर्वीही उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हा 50 आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, असं पाटील म्हणाले होते. तसच पाटील यांनी संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तरही दिलं होतं. ‘तो गुलाबराव पाटील कोण होता, हे माहीत आहे का? हे गुलाबराव जळगावात पानटपरीवर बसायचे. चुना लावायचे. त्यांना शिवसेनाप्रमुखांनी वर आणलं. उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं. त्यांनी आपल्याशी गद्दारी केली आहे. त्यांना पुन्हा टपरीवर नाही बसायला लावलं तर नाव बदलून ठेवा, अशा शब्दात राऊत यांनी पाटलांवर टीका केली होती. त्यावर पाटील यांनीही राऊतांना उत्तर दिलं होतं. ‘आमची परिस्थित काहीच नव्हती. तरीही आम्हाला सर्वकाही मिळालं. शिवसेनेच्या आशीर्वादाने मिळालं. पण त्यात आमचाही त्याग आहे. आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्रं ठेवली. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत. राऊत म्हणतात मला टपरीवर पाठवू. त्यांना चुना कसा लावता माहीत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा चुना लावू’, असा इशाराच पाटलांनी दिला होता.

‘राऊतांनी 35 लग्न लावून दाखवावीत’

आमच्या यशात शिवसेनेचा 80 टक्के वाटा आहे. पण 20 टक्के आमचाही मेहनत आहे. आम्ही घरादाराचा त्याग करून संघटना वाढवत होतो. राऊतांनी 47 डिग्री सेल्सिअस तापमानात जळगावात येऊन 35 लग्न लावावेत. मी त्यांना बहाद्दर म्हणेल. त्याकाळात आम्हीच लग्न लावत असतो, असंही पाटील म्हणाले होते.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...