AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संजय राऊत यांनी हलकट सारखं सांगितलं निघून जा, मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात’, गुलाबराव पाटलांची जाहीर नाराजी, ठाकरेंवरही टीका

शेवटी नेत्यानेही कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे, पण आमचं म्हणणं उद्धव ठाकरेंनी ऐकून घेतलं नाही. माझ्या वैयक्तिक प्रश्न नव्हता पण पहिल्यांदा आमदार झालेल्यांची अडचण होती, म्हणून आमदारांनी उठाव केला, असं दावा पाटील यांनी केलाय.

'संजय राऊत यांनी हलकट सारखं सांगितलं निघून जा, मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात', गुलाबराव पाटलांची जाहीर नाराजी, ठाकरेंवरही टीका
गुलाबराव पाटीलImage Credit source: Google
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 23, 2022 | 11:06 PM
Share

जळगाव : शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर उद्धव ठाकतरे, संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे यांनी पाटलांवर जोरदार टीकाही केली. त्या टीकेला आता गुलाबराव उत्तरं देताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी हलकट सारखं सांगितलं निघून जा, मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात, अशा शब्दात पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. शेवटी नेत्यानेही कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे, पण आमचं म्हणणं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ऐकून घेतलं नाही. माझ्या वैयक्तिक प्रश्न नव्हता पण पहिल्यांदा आमदार झालेल्यांची अडचण होती, म्हणून आमदारांनी उठाव केला, असं दावा पाटील यांनी केलाय.

संजय राऊतांची टीका, गुलाबरावांचं प्रत्युत्तर

गुलाबराव पाटलांनी यापूर्वीही उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हा 50 आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, असं पाटील म्हणाले होते. तसच पाटील यांनी संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तरही दिलं होतं. ‘तो गुलाबराव पाटील कोण होता, हे माहीत आहे का? हे गुलाबराव जळगावात पानटपरीवर बसायचे. चुना लावायचे. त्यांना शिवसेनाप्रमुखांनी वर आणलं. उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं. त्यांनी आपल्याशी गद्दारी केली आहे. त्यांना पुन्हा टपरीवर नाही बसायला लावलं तर नाव बदलून ठेवा, अशा शब्दात राऊत यांनी पाटलांवर टीका केली होती. त्यावर पाटील यांनीही राऊतांना उत्तर दिलं होतं. ‘आमची परिस्थित काहीच नव्हती. तरीही आम्हाला सर्वकाही मिळालं. शिवसेनेच्या आशीर्वादाने मिळालं. पण त्यात आमचाही त्याग आहे. आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्रं ठेवली. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत. राऊत म्हणतात मला टपरीवर पाठवू. त्यांना चुना कसा लावता माहीत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा चुना लावू’, असा इशाराच पाटलांनी दिला होता.

‘राऊतांनी 35 लग्न लावून दाखवावीत’

आमच्या यशात शिवसेनेचा 80 टक्के वाटा आहे. पण 20 टक्के आमचाही मेहनत आहे. आम्ही घरादाराचा त्याग करून संघटना वाढवत होतो. राऊतांनी 47 डिग्री सेल्सिअस तापमानात जळगावात येऊन 35 लग्न लावावेत. मी त्यांना बहाद्दर म्हणेल. त्याकाळात आम्हीच लग्न लावत असतो, असंही पाटील म्हणाले होते.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?