मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह केला होता. त्यामुळं राणा दाम्पत्याला तुरुंगात जावे लागले. तुरुंगवारी संपल्यानंतर राणा दाम्पत्य हे दिल्लीमध्ये होते. नवनीत राणा व आमदार रवी राणा नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पावणे एक वाजता दाखल झाले. पोलिसांनी विमानतळावर राणा दाम्पत्यांशी चर्चा केली. त्यानंतर नवनीत राणा, रवी राणा यांचं नागपूर येथे स्वागत करण्यात आले.नागपुरातील रामनगर येथील हनुमान मंदिरात महाराष्ट्राची शनी दूर झाली पाहिजे, यासाठी हनुमान चालिसा पठण करत आहेत.