AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जैतापूर प्रकल्पावरून राजकारण तापले; आम्ही स्थानिकांसोबत उदय सामंतांचे स्पष्टीकरण, चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला

जैतापूर अणू उर्जा प्रकल्पासाठीच्या अणू भट्ट्या उभारणीसाठी केंद्राने मंजुरी दिली आहे. आता यावरून राजकारण तापताना दिसत असून, शिवसेनेकडून या प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. यावर शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही जनतेसोबत असल्याचे म्हटले आहे.

जैतापूर प्रकल्पावरून राजकारण तापले; आम्ही स्थानिकांसोबत उदय सामंतांचे स्पष्टीकरण, चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 1:40 PM
Share

रत्नागिरी : जैतापूर अणू उर्जा प्रकल्पासाठीच्या अणू भट्ट्या उभारणीसाठी केंद्राने मंजुरी दिली आहे. आता यावरून राजकारण तापताना दिसत असून, शिवसेनेकडून या प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. जैतापूर प्रकल्पामुळे कोकणाला काय मिळणार हे पाहावं लागेल. शिवाय, आम्ही स्थानिकांसोबत असून स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका असेल अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिली आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. सामंत पुढे बोलताना म्हणाले की,  यापूर्वी देखील शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण, स्थानिकांच्या विरोधात जाऊन आम्ही निर्णय घेणार नाही. स्थानिकांचा निर्णय अंतिम असेल.

चंद्रकांत पाटलांना टोला

यावेळी बोलताना त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. दोन -तीन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपली जागा पक्षात पक्की राहावी यासाठी कदाचित ते बोलले असतील. मात्र पाटलांनी एक लक्षात ठेवावे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व धर्म समभाव होता. त्यांनी कधीही कोणासोबत भेदभाव केला नाही असा टोलाही सामंत यांनी  यावेळी लगावला आहे.

भाजपाच्या भूमिकेचे स्वागत

त्यांनी ओबीसी आरक्षणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होवू नये अशी मागणी केली जात असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. आम्ही देखील मंत्री मंडळच्या बैठकित तसा ठराव केला आहे. तसं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार निधी वाटपावरून राजकारण सुरू असल्याचे आरोप करण्यात येते होते. या आरोपाचे खंडन  उदय सामंत यांनी केले आहे. निधी वाटपावरून कोणासोबतही दुजाभाव केला जात नसून, समान पद्धतीने विकास निधीचे वाटप होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आयोगाला निधी कमी पडू देणार नाही: अजित पवार

राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, पण निधी मिळण्यात सर्वात मागे; सर्वाधिक निधी कुणाला?

एकाचवेळी निवडणूक घ्या, निवडणूक आयोगाला विचार करावाच लागेल: बाळासाहेब थोरात

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.