AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जैतापूर प्रकल्पावरून राजकारण तापले; आम्ही स्थानिकांसोबत उदय सामंतांचे स्पष्टीकरण, चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला

जैतापूर अणू उर्जा प्रकल्पासाठीच्या अणू भट्ट्या उभारणीसाठी केंद्राने मंजुरी दिली आहे. आता यावरून राजकारण तापताना दिसत असून, शिवसेनेकडून या प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. यावर शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही जनतेसोबत असल्याचे म्हटले आहे.

जैतापूर प्रकल्पावरून राजकारण तापले; आम्ही स्थानिकांसोबत उदय सामंतांचे स्पष्टीकरण, चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 1:40 PM
Share

रत्नागिरी : जैतापूर अणू उर्जा प्रकल्पासाठीच्या अणू भट्ट्या उभारणीसाठी केंद्राने मंजुरी दिली आहे. आता यावरून राजकारण तापताना दिसत असून, शिवसेनेकडून या प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. जैतापूर प्रकल्पामुळे कोकणाला काय मिळणार हे पाहावं लागेल. शिवाय, आम्ही स्थानिकांसोबत असून स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका असेल अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिली आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. सामंत पुढे बोलताना म्हणाले की,  यापूर्वी देखील शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण, स्थानिकांच्या विरोधात जाऊन आम्ही निर्णय घेणार नाही. स्थानिकांचा निर्णय अंतिम असेल.

चंद्रकांत पाटलांना टोला

यावेळी बोलताना त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. दोन -तीन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपली जागा पक्षात पक्की राहावी यासाठी कदाचित ते बोलले असतील. मात्र पाटलांनी एक लक्षात ठेवावे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व धर्म समभाव होता. त्यांनी कधीही कोणासोबत भेदभाव केला नाही असा टोलाही सामंत यांनी  यावेळी लगावला आहे.

भाजपाच्या भूमिकेचे स्वागत

त्यांनी ओबीसी आरक्षणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होवू नये अशी मागणी केली जात असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. आम्ही देखील मंत्री मंडळच्या बैठकित तसा ठराव केला आहे. तसं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार निधी वाटपावरून राजकारण सुरू असल्याचे आरोप करण्यात येते होते. या आरोपाचे खंडन  उदय सामंत यांनी केले आहे. निधी वाटपावरून कोणासोबतही दुजाभाव केला जात नसून, समान पद्धतीने विकास निधीचे वाटप होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आयोगाला निधी कमी पडू देणार नाही: अजित पवार

राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, पण निधी मिळण्यात सर्वात मागे; सर्वाधिक निधी कुणाला?

एकाचवेळी निवडणूक घ्या, निवडणूक आयोगाला विचार करावाच लागेल: बाळासाहेब थोरात

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.