AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझीही इच्छा, पवार घराण्यातील व्यक्तीचंच मोठं विधान; राष्ट्रवादीत काय शिजतंय?

राज्यातील सत्ताधारी सध्या केवळ मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारण करत आहेत. त्यांना महापालिकेशिवाय काहीच दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझीही इच्छा, पवार घराण्यातील व्यक्तीचंच मोठं विधान; राष्ट्रवादीत काय शिजतंय?
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझीही इच्छा, पवार घराण्यातील व्यक्तीचंच मोठं विधानImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 26, 2022 | 3:29 PM
Share

बारामती: दिवाळी (diwali) निमित्ताने एका कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांना एक बॅनर दिलं. त्यावर भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख होता. त्यामुळे अजित पवार आणि मुख्यमंत्रीपद याची जोरदार चर्चा रंगली. त्यात राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी एक विधान केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही माझीही इच्छा आहे, असं रोहित पवार म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीत काय शिजतंय अशी चर्चा रंगली आहे.

आमदार रोहित पवार यांनी मीडियाशी संवाद ही प्रतिक्रिया व्यक्त केली.वअजितदादा मुख्यमंत्री व्हावेत असं अनेकांचं मत आहे. तसं माझंही मत आहे. शेवटी आकड्यांचं समीकरण बघावं लागतं. येत्या काळात जे काही समीकरण असेल, मित्र पक्षांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल, असं रोहित पवार म्हणाले.

नक्कीच एक ताकदवान व्यक्ती जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसतो, ज्याचा प्रशासनावर वचक असतो, ज्याला काम करण्याची पद्धत माहीत असते तेव्हा अख्ख्या प्रशासनाची निर्णय घेण्याची क्षमता वाढते. जेव्हा निर्णय पटापटा घेतले जातात तेव्हा त्याचा लोकांना फायदा होतो, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होत असेल तर राज्याला फायदा होईल. अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल. आघाडीमध्ये असताना मोठे नेते निर्णय घेत असतात. त्यामुळे जो मुख्यमंत्री होईल तो स्वत: निर्णय घेणारा असावा, असंही त्यांनी सांगितलं.

निलेश आणि नितेश राणे यांना माझ्या मतदारसंघात यायचं असेल तर या. पण निवडून कुणाला द्यायचं हे राज्यातील लोकच ठरवणार. मी हवेत बोलत नाही. कुणाला यायचं असेल तर या. माझा माझ्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे, असंही ते म्हणाले.

राज्यातील सत्ताधारी सध्या केवळ मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारण करत आहेत. त्यांना महापालिकेशिवाय काहीच दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. बारामतीच्या विषयावर बोलल्याशिवाय बातमी होत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागच्या वेळी 110 टक्के पाऊस झाल्यावर ओला दुष्काळ जाहीर करण्याची आजच्या सत्ताधाऱ्यांनी मागणी केली होती. आता त्यापेक्षा जास्त पाऊस पडला. मागणी करणारे सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांनी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Follow Us
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?