AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर ओवेसींना निजामासारखं हैदराबाद सोडून पळावं लागेल, योगींचा इशारा

हैदराबाद : तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका करत आहेत. तर दुसरीकडे प्रचारासाठी तेलंगणात आलेले यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ओवेसींचा समाचार घेतलाय. भाजपची सत्ता आल्यास ओवेसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल, असा इशारा योगींनी दिलाय. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये प्रचारसभेला संबोधित […]

... तर ओवेसींना निजामासारखं हैदराबाद सोडून पळावं लागेल, योगींचा इशारा
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM
Share

हैदराबाद : तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका करत आहेत. तर दुसरीकडे प्रचारासाठी तेलंगणात आलेले यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ओवेसींचा समाचार घेतलाय. भाजपची सत्ता आल्यास ओवेसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल, असा इशारा योगींनी दिलाय.

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचा समाचार घेतला. मी तुम्हाला विश्वास देतो, की जसा निजाम हैदराबाद सोडून पळाला होता, तसंच ओवेसीलाही भाजपची सत्ता आल्यावर तेलंगणातून पळावं लागेल, असं योगी म्हणाले.

आमदार राजा सिंह काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, की ओवीसीचं डोकं शरीरापासून वेगळं केल्यानंतरच समाधान मिळेल. या वक्तव्यानंतर आता योगींनी हा इशारा दिलाय. यापूर्वी ओवेसींनीही भाजपवर हल्लाबोल केला होता. मदरसे आणि मुस्लीम समाजाची धार्मिक स्थळं बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकार आपल्याला पाहू इच्छित नाही, असं वक्तव्य ओवेसींनी केलं होतं.

एमआयएमला हरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार हैदराबादला येत आहेत. तर भाजपाध्यक्ष अमित शाह पाच वेळा इथे आले आहेत. यूपी आणि बंगालमध्ये जे केलंय, त्याप्रमाणेच ते आपला आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ओवेसींनी केला.

देशात सध्या निवडणुकांचं वातावरण आहे. मिझोराम, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या पाच राज्यांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 11 तारखेला लागणार आहे. पाचही राज्यांमध्ये सर्वच पक्ष पूर्ण तयारीने मैदानात उतरले आहेत.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये मतदान पार पडलं आहे. पण भाजपची सत्ता असलेलं राजस्थान आणि टीआरएसची सत्ता असलेल्या तेलंगणात अजून मतदान बाकी आहे. 7 तारखेला या दोन्ही राज्यातलं मतदान झाल्यानंतर एकाच दिवशी पाच राज्यांचा निकाल लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पाच राज्यांच्या निवडणुकांना अत्यंत महत्त्व आहे.

Follow Us
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.