AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार आल्यास 22 लाख नोकऱ्या देणार, राहुल गांधींची मोठी घोषणा

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार आल्यास 31 मार्च 2020 पर्यंत 22 लाख रिक्त सरकारी पदांची भरती केली जाईल, असे आश्वासन राहुल गांधींनी दिले आहे. गांधी यांनी याआधी ‘न्याय’ या योजनेचीही घोषणा केलेली आहे. राहुल गांधी यांनी […]

सरकार आल्यास 22 लाख नोकऱ्या देणार, राहुल गांधींची मोठी घोषणा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार आल्यास 31 मार्च 2020 पर्यंत 22 लाख रिक्त सरकारी पदांची भरती केली जाईल, असे आश्वासन राहुल गांधींनी दिले आहे. गांधी यांनी याआधी ‘न्याय’ या योजनेचीही घोषणा केलेली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट केले, “आज सरकारच्या विविध विभागांमध्ये 22 लाख नोकऱ्या रिक्त आहेत. आम्ही 31 मार्च 2020 पर्यंत या रिक्त जागा भरू. आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांसाठी केंद्राकडून प्रत्येक राज्याला सरकारी निधीच्या होणाऱ्या हस्तांतरणाशी या रिक्त पदांना जोडले जाईल.”

25 कोटी नागरिकांच्या थेट खात्यात वार्षिक 72,000 रुपये देणार

याआधी राहुल गांधींनी आपला पक्ष सत्तेत आल्यास ‘न्याय’ म्हणजेच किमान वेतन योजना आणि खरा जीएसटी आणण्याचीही घोषणा केली आहे. सोमवारी घोषणा केलेल्या न्याय योजने अंतर्गत देशातील 5 कोटी कुटुंबांना आणि 25 कोटी नागरिकांच्या थेट खात्यात वार्षिक 72,000 रुपये देणार आहेत. दुसरीकडे चिदंबरम यांनी या योजनेचे समर्थन करत अनेक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच या योजनेची घोषणा केल्याचे म्हटले होते. तसेच 2019 ते 2024 दरम्यान देशाचे दरडोई उत्पन्न (जीडीपी) वाढणार असल्याने या तज्ज्ञांनी भारतात ही योजना लागू करणे सहज शक्य असल्याचे सांगितले आहे, असेही चिदंबरम यांनी नमूद केले.

चिदंबरम यांच्यानुसार गरीबी निर्मुलनासाठी किमान वेतन असणे आवश्यक आहे. तसेच भारतासारख्या देशात ही योजना केवळ टप्प्यांमध्ये लागू केली जाऊ शकतो. या योजनेंतर्गत जवळजवळ 5 कोटी कुटुंबांचा सहभाग असेल. योजनेची अंमलबजावणी तज्ज्ञांच्या समितीकडून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ:

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.