AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाबद्दल द्वेष असल्यानं तीन पक्ष एकत्र, हिंमत असेल तर स्वतंत्र लढून दाखवा : चंद्रकांत पाटील

जर हिंमत असेल तर या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवून दाखवावं," असं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीला (Chandrakant patil criticizes maha vikas aaghdi) दिलं आहे.

भाजपाबद्दल द्वेष असल्यानं तीन पक्ष एकत्र, हिंमत असेल तर स्वतंत्र लढून दाखवा : चंद्रकांत पाटील
| Updated on: Jan 04, 2020 | 7:46 PM
Share

बारामती : “राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष भाजपबद्दलचा राग, द्वेष, तिरस्कार यातून एक हाती सत्तेवर आले आहेत. भाजपला हरवण्यासाठी यांना एकत्र यावं लागतंय यातच आम्हाला आनंद आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant patil criticizes maha vikas aaghdi) केलं आहे. जर हिंमत असेल तर या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवून दाखवावं,” असं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीला (Chandrakant patil criticizes maha vikas aaghdi) दिलं आहे.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “हे तिन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. निवडणुका झाल्यानंतर या तिन्ही पक्षांची आघाडी होते. जर यांनी भविष्यात एकत्रित निवडणूक लढवली तर जनता कोणाला साथ देते हे आपोआप समोर येईल असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. जर यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी,” असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

“मुख्यमंत्र्यांकडेच कोणतेच खाते नाही अशी स्थिती सध्या राज्यात आहे. शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 14 मंत्रिपदं मिळाली आहेत. तकलादू खाती शिवसेनेसह काँग्रेसकडे दिलेली आहेत. मात्र हे सरकार फार काळ चालणार नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant patil criticizes maha vikas aaghdi) सांगितलं.

“शिवसेनेनं या सरकारपायी हिंदुत्ववादी भूमिका सोडली. सावरकर यांच्यासारखे अनेक समोर आले तरी हे बोलायला तयार नाहीत. सावरकरांच्या कुटुंबियांनी अनेकदा मुख्यमंत्र्याना भेटीची वेळ मागितली मात्री त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध नसल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला.”

नाराजी फार काळ टिकत नाही..!

महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आपापले वाद संपवावेत आणि जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावं असं सांगतानाच या आघाडीतील नेत्यांची नाराजी फार काळ टिकेल असं वाटत नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. सत्ता ही फेविकॉलप्रमाणे असते, त्यामुळं प्रत्येकजण तिथे चिटकून राहतो, असंही सांगायला चंद्रकांत पाटील विसरले (Chandrakant patil criticizes maha vikas aaghdi) नाहीत.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.