AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर वंचितला सत्ता द्या : प्रकाश आंबेडकर

देशभरात आरक्षणावरुन गोंधळ सुरु असल्याचं म्हणत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. सर्व घटकांचं आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.

आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर वंचितला सत्ता द्या : प्रकाश आंबेडकर
| Edited By: | Updated on: Jul 11, 2019 | 4:21 PM
Share

नवी दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. देशभरात आरक्षणावरुन गोंधळ सुरु असल्याचं म्हणत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. सर्व घटकांचं आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.

मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. आमचं 27 टक्के आरक्षण संपुष्टात येईल, अशी भीती ओबीसींनाही आहे. लोकांच्या मनातून ही भीती काढण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना कोणताही प्रयत्न करत नाही. ओबीसी आणि मराठा आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सत्ता, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं.

मराठा आणि ओबीसी आरक्षण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून देऊ. ओबीसी आरक्षणाला अ आणि मराठा आरक्षणाला ब असा गट दिला असता, तर ओबीसी आरक्षण जाणार नाही यांची भीती निर्माण होणार नाही. ओबीसी आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेची तयारी सुरु केल्यानंतर आता राजकीय वातावरणही तापू लागलंय. कारण, कोणतीही चर्चा न होताच त्यांनी काँग्रेसला फक्त 40 जागांचा प्रस्ताव दिलाय. लोकसभेत आम्ही जास्त मतं मिळवली असं म्हणत वंचितकडून हा प्रस्ताव देण्यात आलाय. काँग्रेसला मिळणारी मतं अनेक ठिकाणी वंचितला मिळाली आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे काँग्रेसही विधानसभेसाठी सावध पाऊल टाकत आहे. पण प्रकाश आंबेडकरांना 40 जागांचा प्रस्ताव देऊन सूचक संकेत दिले आहेत.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.