AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर वंचितला सत्ता द्या : प्रकाश आंबेडकर

देशभरात आरक्षणावरुन गोंधळ सुरु असल्याचं म्हणत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. सर्व घटकांचं आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.

आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर वंचितला सत्ता द्या : प्रकाश आंबेडकर
| Edited By: | Updated on: Jul 11, 2019 | 4:21 PM
Share

नवी दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. देशभरात आरक्षणावरुन गोंधळ सुरु असल्याचं म्हणत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. सर्व घटकांचं आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.

मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. आमचं 27 टक्के आरक्षण संपुष्टात येईल, अशी भीती ओबीसींनाही आहे. लोकांच्या मनातून ही भीती काढण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना कोणताही प्रयत्न करत नाही. ओबीसी आणि मराठा आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सत्ता, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं.

मराठा आणि ओबीसी आरक्षण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून देऊ. ओबीसी आरक्षणाला अ आणि मराठा आरक्षणाला ब असा गट दिला असता, तर ओबीसी आरक्षण जाणार नाही यांची भीती निर्माण होणार नाही. ओबीसी आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेची तयारी सुरु केल्यानंतर आता राजकीय वातावरणही तापू लागलंय. कारण, कोणतीही चर्चा न होताच त्यांनी काँग्रेसला फक्त 40 जागांचा प्रस्ताव दिलाय. लोकसभेत आम्ही जास्त मतं मिळवली असं म्हणत वंचितकडून हा प्रस्ताव देण्यात आलाय. काँग्रेसला मिळणारी मतं अनेक ठिकाणी वंचितला मिळाली आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे काँग्रेसही विधानसभेसाठी सावध पाऊल टाकत आहे. पण प्रकाश आंबेडकरांना 40 जागांचा प्रस्ताव देऊन सूचक संकेत दिले आहेत.

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.