AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेला घाबरत नाही, आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलंय, जलील यांचं राज ठाकरेंना उत्तर

इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहेत, आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा तुमच्या कानाला त्रास झाला नाही का? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel on Raj Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे.

मनसेला घाबरत नाही, आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलंय, जलील यांचं राज ठाकरेंना उत्तर
| Updated on: Jan 24, 2020 | 12:59 PM
Share

औरंगाबाद : “इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहेत, आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा तुमच्या कानाला त्रास झाला नाही का?” असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel on Raj Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. “धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावेत. त्यासाठी मशिदींवर लागलेले भोंगे काढावेत. आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतोय?” असा सवाल राज ठाकरे (Imtiyaz Jaleel on Raj Thackeray) यांनी मनसेच्या महाअधिवेशनात उपस्थित केला होता. तसंच राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देत, सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा केली.

याबाबत इम्तियाज जलील म्हणाले, “इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहेत, आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा तुमच्या कानाला त्रास झाला नाही का? फक्त राजकारणासाठी हा मुद्दा आता बाहेर आणला जात आहे. शिवसेना सेक्युलर झाली त्यामुळे आता मनसेसाठी जमीन तयार झाली आहे आणि त्याचा फायदा घेण्यासाठी मनसे राजकारण करत आहे”

आम्ही मनसेला घाबरत नाही, आम्ही आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलं आहे, त्यामुळे एमआयएम कुणालाही घाबरत नाही, असं इम्तियाज जलील यांनी ठणकावलं.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

“धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावेत. त्यासाठी मशिदींवर लागलेले भोंगे काढावेत. आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतोय? नमाज का पढता असं आम्ही म्हणत नाही. भोंगा लावून नमाज का पढता? किती बांग्लादेशी भारतात आले याचा काहीच अंदाज नाही. हे बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावा असं अनेक वर्षांपासून सांगतो आहे. तेव्हा कुणी नाही म्हणालं, हिंदुत्वाकडे जात आहात? भारत काय धर्मशाळा नाही. कुणीही येथे यावं आणि येथे राहावं, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी सीएएच्या समर्थनार्थ 9 फेब्रुवारीला मोर्चा काढू”, असं राज ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या  

राज ठाकरेंचा नागरिकत्व कायद्याला पाठिंबा, मनसेचा 9 फेब्रुवारीला मोर्चा!

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.