AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane : पालकमंत्री निवडीवर शिंदे सरकारमध्ये अंतर्गत नाराजी, ठाण्यातच ‘हे’ असे घडले..!

पालकमंत्र्यांच्या निवडीनंतर शिंदे सरकारमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे नाराजांना कशी आवर घालावी असा प्रश्न सरकारपुढे आहे. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच असे घडले आहे.

Thane : पालकमंत्री निवडीवर शिंदे सरकारमध्ये अंतर्गत नाराजी, ठाण्यातच 'हे' असे घडले..!
माजी नगरसेवक मंदार टावरे
| Updated on: Sep 25, 2022 | 5:26 PM
Share

सुनील जाधल टीव्ही9 प्रतिनिधी ठाणे : राज्यभरातील विकास कामांमुळे आणि तडकाफड घेतले जात असलेल्या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा वरचष्मा राहिलेला आहेच. शिवाय राज्यभर त्यांच्या सभांनाही जनतेची मोठी गर्दी होत आहे. हे सर्व असले तरी शिंदे गट आणि भाजपात (BJP) सर्वकाही अलबेल असे नाही. कारण पालकमंत्र्यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून म्हणजेच ठाण्यातूनच (Thane) नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मिस्टर गुवाहाटी…काही तरी सोडा भूमिपुत्रांसाठी, नाही तर परत लढावं लागेल आमच्या अस्मितेसाठी अशी फेसबुक पोस्ट भाजपाचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी केली आहे. याबाबत त्यांचे म्हणणे समोर आले नसले तरी ही पोस्ट सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शंभूराज देसाई यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजपामध्ये नाराजी पसरली आहे. शिवाय माजी नगरसेवकाच्या पोस्टमुळे ठाण्यात शिंदे गट विरुद्ध भाजपा असेच चित्र निर्माण झाले आहे.

ठाण्याचे पालकमंत्री हे शंभूराज देसाई हे असले तरी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना डावलून शंभूराज देसाई यांना पालकत्व का दिले असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय फेसबुक पोस्ट करणारे नगरसेवक हे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत.

शिंदे गट आणि भाजपामध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचे दाखवले जाते. पण स्थानिक पातळी मतभेद वाढताना पाहवयास मिळत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये तर हे शीत युद्ध सुरुच आहे. पण पालकमंत्र्यांच्या निवडीनंतर अधिक तीव्रतेने ते जाणवू लागले आहे.

मुख्यमंत्र्यांना मिस्टर गुवाहाटी…काही तरी सोडा भूमिपुत्रांसाठी, नाही तर परत लढावं लागेल आमच्या अस्मितेसाठी अशी खोचक फेसबुक पोस्ट टावरे यांनी केली आहे. याबाबत त्यांचे म्हणणे अद्याप समोर आले नसले तरी या पोस्टने बरेच काही सांगून टाकले आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.