AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाषण संपवण्याची सवय, जय हिंद जय महाराष्ट्र, मात्र कोलकात्यात पवार म्हणाले…..

Mamata Banerjee Rally कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकारविरोधात सर्व विरोधीपक्षांना एकत्र करत, कोलकात्यात मेगारॅलीचं आयोजन केलं. देशभरातील दिग्गज नेत्यांनी या महा रॅलीला (Maha Rally) हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गुजरातमधील पाटिदार नेते हार्दिक पटेल, […]

भाषण संपवण्याची सवय, जय हिंद जय महाराष्ट्र, मात्र कोलकात्यात पवार म्हणाले.....
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM
Share

Mamata Banerjee Rally कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकारविरोधात सर्व विरोधीपक्षांना एकत्र करत, कोलकात्यात मेगारॅलीचं आयोजन केलं. देशभरातील दिग्गज नेत्यांनी या महा रॅलीला (Maha Rally) हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गुजरातमधील पाटिदार नेते हार्दिक पटेल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांचे सर्व दिग्गज उपस्थित होते.

यावेळी शरद पवार यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. पवार म्हणाले, “विरोधीपक्षांना संघटीत करण्याचे काम ममताजींनी केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मोदी सरकारच्या काळात आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही देशाला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहे. शेतकरी आज आत्महत्या करतोय. घटनात्मक संस्थांना धोका निर्माण झाला आहे. जनतेची फसवणूक झाली आहे. देशाला बदल हवा आहे”

मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी आणली. मात्र त्यामुळे जनतेला प्रचंड त्रासच झाला. उद्योग बंद होत आहेत, बेरोजगारी वाढत आहे. ही परिस्थिती ज्यांनी निर्माण केली, ते सरकार उलथून टाकण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे, असं शरद पवार म्हणाले.

भाजपवाल्यांना वाटतं आम्ही पंतप्रधानपदासाठी वाद घालू, मात्र आम्ही इथे पदासाठी लढत नाही तर मोदी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी एकत्र आलो आहे, असं पवारांनी ठणकावलं.

भाषणाचा शेवट शरद पवार (Sharad Pawar) यांनी पश्चिम बंगालमध्ये केलेल्या आपल्या भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पवारांनी आपल्या भाषणाचा शेवट पश्चिम बंगालच्या जयघोषाने केला.

पवार म्हणाले, “आम्ही आपल्याला आश्वासन देतो की आम्ही तुमच्या हक्काचं रक्षण करु, आम्ही एकत्र राहून तुमच्या हक्काचं रक्षण करु. मोदी सरकार बदलण्यासाठी सर्वजण मेहनत घेऊ. आपल्या सर्वांच्या साथीने देशात नवं सरकार आणू. लोकांच्या हिताचं रक्षण करु, हे सांगून मी आपली रजा घेतो, ‘जय हिंद जय बांगला’.

शरद पवारांनी भाषणाचा शेवट ‘जय हिंद जय बांगला’ असा केला.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत