AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारची दोन हजार कोटींची घोषणा, म्हणजे हवेतल्या गप्पा, जत तालुक्यातील नागरिकांची खदखद बाहेर

जत तालुक्यातील पाणी प्रश्नाचा जर का 24 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर आम्ही 42 गावासह विविध ठिकाणी बैठका घेऊन कर्नाटकात जाण्याबाबत निर्णय घेणार आहोत असा सज्जड दमही या समितीने दिला आहे.

सरकारची दोन हजार कोटींची घोषणा, म्हणजे हवेतल्या गप्पा, जत तालुक्यातील नागरिकांची खदखद बाहेर
| Updated on: Dec 04, 2022 | 10:25 PM
Share

सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी अकलूज आणि पंढरपूरही दावा सांगितला होता. मात्र जत तालुक्यातील गावांना कर्नाटकातून पाणी सोडण्यात आल्यावर मात्र हा वाद टोकाला गेला. त्यावरूनच हा वाद आता आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे. आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमाभागातील गावांवर दावा केल्यानंतर आता सांगलीतील जत तालुक्यामधील गावांनीच आता कर्नाटकात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर 2 हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती.

त्याबाबत येत्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा अन्यथा 24 तारखेपासून आम्ही कर्नाटकात जाण्याबाबत बैठका घेऊ असा अल्टिमेटम मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता या नव्या वादाला सुरूवात होणार असल्याचे दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 हजार कोटींच्या मोठ्या घोषणा केली होती, मात्र ती खोट्या ठरल्या आहेत असं वक्तव्य पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी केले आहे.

त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आताच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा विषय मंजूर करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ मोठ्या घोषणा केल्या होत्या मात्र त्या घोषणा सीमाभागाील लोकांपर्यंत पोहचल्याच नाहीत.

त्यामुळे या घोषणा खोट्या ठरल्या असल्याचा ठपकाही पाणी संघर्ष समितीने ठेवला आहे. त्यामुळे 2 हजार कोटीची घोषणा म्हणजे हे थोतांड असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

ज्या प्रकारे सरकारकडून या घोषणा केल्या जातात, त्या योजनांची सरकारने कागदोपत्री तरतूद करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दोन हजार कोटी रुपयांची घोषणा केली गेली मात्र त्याबाबत येत्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला जावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी ती घोषणा जाहीर केल्यावर त्याला होणारा विरोध तरी पाणी संघर्ष समितीला कळेल असं मतही या समितीने मांडले आहे.

जत तालुक्यातील पाणी प्रश्नाचा जर का 24 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर आम्ही 42 गावासह विविध ठिकाणी बैठका घेऊन कर्नाटकात जाण्याबाबत निर्णय घेणार आहोत असा सज्जड दमही या समितीने दिला आहे.

मंत्री उदय सामंत उद्या उमदीमध्ये समस्या पाहण्यासाठी येत आहेत. त्याविषयी पाणी समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी बोलताना सांगितले की, त्यांनी या ठिकाणी यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू मात्र आमच्या समस्या पाहून त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान आम्ही पुढच्या रविवारीदेखील एक बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या पुढच्या आमच्या सगळ्या भूमिका या सरकारसाठी अल्टिमेटिमच असतील असा इशारा देत सुनील पोतदार यांनी सांगितले की, जत तालुक्यातील पाणी प्रश्नाचा जर का 24 तारखेपर्यंत निर्णय घेतला गेला नाही तर आम्ही 42 गावांसह विविध ठिकाणी बैठका घेऊन कर्नाटकात जाण्याबाबत निर्णय घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.