AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं अशक्य होईल : जयंत पाटील

भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे (BJP remark on Uddhav Thackeray).

भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं अशक्य होईल : जयंत पाटील
| Updated on: Feb 03, 2020 | 3:41 PM
Share

मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे (BJP remark on Uddhav Thackeray). जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं अशक्य होईल, असा थेट इशारा दिला आहे (BJP remark on Uddhav Thackeray). आशिष शेलार यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू न करायला हे बापाचं राज्य आहे का, असं विधान केलं होतं. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

जयंत पाटील म्हणाले, “भाजपनं इतकं घसरण्याची गरज नाही. मला वाटतं त्यांना आशा होती, ती पूर्ण झाली नाही. म्हणूनच भाजप चिडली आहे आणि बाप काढण्याच्या पातळीवर गेली. आपण कुणाचा बाप काढतो आहोत याचंही यांना भान राहिलेलं नाही. ते ज्यांचा बाप काढतात त्यांनी जर मनात आणलं तर यांना मुंबईत फिरणं देखील अशक्य होईल. मात्र, इतकी पातळी घसरण्याची भाजपवर का वेळ आली यावर भाजपनं आत्मचिंतन करावं.”

“आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातील नाही”

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आशिष शेलार यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, “आशिष शेलार जे बोलले ते मला खूप आवडलं. मी त्यांना आजच सांगतो की होय हे उद्धव ठाकरेंच्या बापाचंच राज्य आहे. हे जितेंद्र आव्हाडच्या बापाचंच राज्य आहे. काळ्या मातीला सह्याद्रीच्या पर्वताला मानणारे आम्ही काळ्या मातील आई मानतो आणि मराठी माणसाला आमचा बाप मानतो. हे मराठी मनाचं राज्य आहे, असं देशभरात-जगभरात सांगणाऱ्यांची आम्ही औलाद आहोत. आम्ही आमचा बाप गुजरातमध्ये शोधायला जात नाही.”

व्हिडीओ :

Follow Us
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.