AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटलांकडून जागतिक निद्रा दिनी केंद्रातील भाजप सरकारला कुंभकर्णाची उपमा, मोदी सरकारवर निशाणा

जागतिक निद्रा दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे (Jayant Patil compare Modi Government as Kumbhakarna).

जयंत पाटलांकडून जागतिक निद्रा दिनी केंद्रातील भाजप सरकारला कुंभकर्णाची उपमा, मोदी सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
| Updated on: Mar 19, 2021 | 5:36 PM
Share

मुंबई : जगभरात आज जागतिक निद्रा दिन साजरा केला जातोय. या जागतिक निद्रा दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारला ट्विटरवर कुंभकर्ण अशी उपमा दिली आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांकडून भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोक त्यांच्या ट्विटचं समर्थन करत आहेत. तर काही लोक टीका करत आहेत (Jayant Patil compare Modi Government as Kumbhakarna).

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

“शेतकरी आंदोलनात जवळपास 300 च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?”, असा सवाल जयंत पाटील यांनी ट्विटरवर केला आहे. त्यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली (Jayant Patil compare Modi Government as Kumbhakarna).

कुंभकर्ण कोण?

कुंभकर्ण हे रामायणातील एक पात्र आहे. कुंभकर्म रावणाचा सर्वात लहान भाऊ होता. त्याला झोपेचं वरदान मिळालं होतं. त्यामुळे तो चक्क सहा महिने झोपायचा. सहा महिन्यांनी तो जेवण वगैरे करायचा. त्यानंतर पुन्हा झोपायचा आणि पुन्हा सहा महिन्यांनी उठायचा. तो प्रचंड उंच, धिप्पाड राक्षसासारखा होता. तो सहा महिने झोपायचा म्हणून जो व्यक्ती जास्त वेळ झोपतो त्याला व्यंगात्मक रुपात कुंभकर्ण म्हटलं जातं.

उर्मिला मातोंडकर यांचं देखील ट्विट

दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी देखील काल ट्विट करत केंद्र सरकारला टोला लगावला होता. विशेष म्हणजे त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या फाटलेल्या जीन्सपबाबतच्या वक्तव्यावरुनही टीका करत दोन्ही विषयांवरुन एकाच ट्विटमधून निशाणा साधला होता. फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय? असा खोचक सवाल उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटरवर विचारला होता. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.

केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना आशा

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोना संकट सुरु आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून बऱ्याच उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हे संकट अचानकपणे आल्याने अनेक गोष्टींसाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. कोरोना काळात केंद्र सरकारकडून 20 लाख कोटींचं पॅकेजही जाहीर करण्यात आलं. गरिबांसाठी मोफत धान्य देण्यात आलं. या कोरोना काळात अनेक कंपन्या बंद पडल्या, अनेकजण बेरोजगार झाले. त्याचबरोबर लॉकडाऊनची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागली. त्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून बरेच प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना केंद्र सरकारकडे आशा आहे. केंद्राकडून पेट्रोल, डिझेल, रोजगार यासारख्या गोष्टींसाठी दिलासा मिळावा, अशी अनेकांची इच्छा आहे.

हेही वाचा : ‘उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा…’ कसं सूचलं?; वाचा रंजक किस्सा!

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.