AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना ‘साले’ बोलणार्‍या शेतकरीविरोधी भाजपचं धोरण घराघरात पोचवा, जयंत पाटलांचा घणाघात

मुळात भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे, असा आरोप करतानाच याच मतदारसंघातील भाजप नेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना 'साले' बोलले होते. त्यांचं हे विधान घराघरात पोचवा', असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.

शेतकऱ्यांना 'साले' बोलणार्‍या शेतकरीविरोधी भाजपचं धोरण घराघरात पोचवा, जयंत पाटलांचा घणाघात
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: sagar joshi | Updated on: Sep 25, 2021 | 8:14 PM
Share

जालना : ‘मोदी सरकारने परदेशातून तेल आयात केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळेनासा झाला आहे. मुळात भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे, असा आरोप करतानाच याच मतदारसंघातील भाजप नेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना ‘साले’ बोलले होते. त्यांचं हे विधान घराघरात पोचवा’, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. एक वेळ असा होता की आपल्या पक्षात कोणी थांबत नव्हतं. लोकं पक्ष सोडून जात होते. आज मात्र त्यांना पश्चाताप होतोय की राष्ट्रवादीत थांबायला हवं होतं. आपण पडत्या काळात पक्षासोबत होतात आजही आहात याबद्दल भोकरदनवासियांना धन्यवाद दिले. (Jayant Patil criticizes Modi Government and Union Minister Raosaheb Danve in Jalna)

2024 ला आपल्या अंगावर गुलाल पाडायचा असेल तर पक्षाचा विस्तार करा. जे पक्ष सोडून गेले आहेत आणि पुन्हा वापस येऊ इच्छितात अशांना सोबत घ्या, त्यांचे कुणी पक्ष सोडत असतील तर त्यांना आपल्या पक्षात घ्या. निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस डोक्यात ठेवून काम करा. मला मान्य आहे इथला कार्यकर्ता लढवय्या आहे. मात्र, आपण किती काळ लढाईच करणार? त्यामुळे 2024 ला गुलाल राष्ट्रवादी काँग्रेसचाच असायला हवा, असंही पाटील यावेळी म्हणाले.

‘भाजपचा सुर्य आता मावळला आहे’

राज्यात आणि दिल्लीत भाजपची सत्ता असल्याने डोक्यावरील सुर्य कधी मावळणार नाही अशा भ्रमात भाजप होती, परंतु तो सुर्य मावळला आहे. आपलं सरकार प्रभावीपणे काम करतंय हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. शिवाय विरोधकांनाही आपलं सरकार आहे हेही जाणवलं पाहिजे. भोकरदन मतदारसंघात चंद्रकांत दानवे म्हणतील ते झालं पाहिजे असं सर्व अधिकार्‍यांना राजेश टोपे तुम्ही सांगा, असा आदेशच जयंत पाटील यांनी दिला. राष्ट्रवादीच्या नेत्यांची तालुका पातळीवर प्रश्न सोडविण्यासाठीची भूमिका असली पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाची भूमिका आग्रही राहिली पाहिजे, असंही पाटील म्हणाले.

‘भोकरदन येथील संघटना प्रचंड लढवय्यी’

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भोकरदन येथील संघटना ही प्रचंड लढवय्यी आहे, समोरच्या बाजूला मोठी ताकद असतानाही तोडीची झुंज राष्ट्रवादी इथे देत आहे. इथला प्रत्येक कार्यकर्ता हा संघर्ष करणारा आहे, अशी शाब्बासकी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्याचबरोबर माजी आमदार चंद्रकांत दानवे इथे प्रत्येक गोष्टीसाठी पाठपुरावा करतात. रस्ते, वीज, पाणी या सर्व गोष्टींवर याबाबत मागणी करत असतात. आपला स्वतःचा आमदार नसल्याने इथे थोड्याबहुत प्रमाणात अडचण येते मात्र या भागाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचा संपूर्ण पाठिंबा आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

‘ओबीसी आरक्षणाबाबत भाजपचा खोटा प्रचार’

भाजप ओबीसी आरक्षणाबाबत धादांत खोटा प्रचार करत आहे. ओबीसी समाजाच्या एकाही जागेला धक्का लागता कामा नये याची खबरदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे. त्यामुळे भाजपच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनहीटोपे यांनी केले. जालना जिल्ह्याचा विकास करण्यासाठी संपूर्ण शासन काम करत आहे. आज कोविडची परिस्थिती आहे त्यामुळे या भागाला नव्या कोऱ्या रुग्णवाहिका दिल्या आहे.राजेश टोपे जालनावासियांसोबत उभा राहिला होता, आजही उभा आहे आणि उद्याही उपस्थित राहील, असे आश्वासनही टोपे यांनी दिले. संवाद यात्रेत भोकरदनचे नेते चंद्रकांत दानवे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी आपले विचार मांडले.

इतर बातम्या :

भाजपनेच ओबीसी, मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा मांडला; जयंत पाटलांचा आरोप

‘युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या’, रोहित पवारांचा घरचा आहेर

Jayant Patil criticizes Modi Government and Union Minister Raosaheb Danve in Jalna

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा