AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सल्ला देणं भोवलं?, रोहित पवार यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांची पहिल्यांदाच टीका; काय म्हणाले?

अन्नपुरानी नावाचा तमिळ सिनेमा आलाय. दक्षिणेतील दोन सुपरस्टार त्यात काम करत आहेत. त्यात त्यांनी वाल्मिकी रामायणातील एक श्लोक म्हणून दाखवला. त्याचा अर्थ समजून सांगितला. तो पाहायचा असेल तर पाहा. मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलं नाही. पण आज अभ्यासाला महत्त्व नाही तर भावनांना महत्त्व आहे. जर माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सल्ला देणं भोवलं?, रोहित पवार यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांची पहिल्यांदाच टीका; काय म्हणाले?
jitendra awhad and rohit pawarImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 04, 2024 | 1:51 PM
Share

शिर्डी | 4 जानेवारी 2023 : देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये. नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेऊ नये, अशा शब्दात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. रोहित पवार यांच्या या टीकेचा जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. मी रोहित पवार यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असा हल्लाच जितेंद्र आव्हाड यांनी चढवला आहे. आव्हाड यांनी पहिल्यांदाच थेट रोहित पवार यांच्यावर टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राम हा मांसाहारी होता, असं विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. आव्हाड यांच्या या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. भाजपने आव्हाड यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन होत आहे. आव्हाड यांच्या विधानाने राजकारण तापल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच आपलं विधान हे ओघातून झालं आहे, असं सांगतानाच आव्हाड यांनी वाल्मिकी रामायण आणि इतर पुस्तकांचा संदर्भ देत त्या पुस्तकात आपण जे म्हटलंय तेच म्हटल्याचाही दावा केला आहे.

ते अजून लहान आहेत

रोहित पवार यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता आव्हाड यांनी रोहित पवार यांनाच फटकारलं आहे. रोहित पवार काय बोलतात त्याला मी फार महत्त्व देत नाहीत. मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही. ते अजून लहान आहेत. पहिली टर्म आहे त्यांची, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांना फटकारलं आहे.

आव्हाडांकडून पुरावे

कधीही मी इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणं हे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोललो. राम आमचा पांडूरंग आहे. राम मांसाहारी होते, हे मी बोललो. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो, वाल्मिकी रामायणात सहा स्कंद आहेत. त्यात अयोध्या स्कंदातील सर्ग 552 आणि श्लोक 10, श्लोक 102 आहे. तो मी इथे वाचणार नाही. ते वाचून मला पुन्हा वाद वाढवायचा नाही. 1891चं डॉक्युमेंट आहे. वेस्ट बेंगालमध्ये प्रिंट केलेलं आहे. ममतानाथा दत्त यांनी अनुवाद केलं आहे. तेही मी वाचणार नाही. तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर कॉपी देतो. त्यात काय म्हटलं ते पाहा आणि मी काय म्हटलं ते पाहा, असं म्हणत आव्हाड यांनी पुरावेच दिले.

वाल्मिकी रामायणातील गोष्टींना आक्षेप आहे का?

आयआयटीतील पोरांनी मला अनेक पेपर्स पाठवले. का पाठवले हे माहीत नाही. त्या त्या काळात रामायणातील श्लोकांचा कसा अनुवाद झाला, ते माझ्याकडे उपलब्ध आहे. वाल्मिकी रामायणात जर काही लिहिलं असेल तर त्याला कुणाचा आक्षेप आहे का ? असेल तर सांगा, असा आव्हानच त्यांनी दिलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.