AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला नेहमी वाटायचं पवार साहेबांनी निवडणूक लढवू नये : जितेंद्र आव्हाड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वागत केलंय. शिवाय पवार साहेबांच्या सामाजिक विचारांशी बांधिलकी असणारा म्हणून मला वाटायचे की, पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. शरद पवार यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर […]

मला नेहमी वाटायचं पवार साहेबांनी निवडणूक लढवू नये : जितेंद्र आव्हाड
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वागत केलंय. शिवाय पवार साहेबांच्या सामाजिक विचारांशी बांधिलकी असणारा म्हणून मला वाटायचे की, पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.

शरद पवार यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही वेळातच जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं. “पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता या  नात्याने तसेच साहेबांच्या सामाजिक विचारांशी बांधिलकी असणारा म्हणून मला वाटायचे कि, पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवू नये. त्यांनी यापूर्वीच जाहीर केल होत की, मी सार्वजनिक निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे त्यांच्यानिर्णयाच मी मनापासून स्वागत करतो”, असं ट्वीट त्यांनी केलं.

मी स्वत: लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला उमेदवारी देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आणि सोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देणार असल्याचीही घोषणा केली. मात्र, पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांनी दोन निकष सांगितले.

पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्याबाबत शरद पवार म्हणाले, “आमच्या कुटुंबीयांमधील सुप्रिया सुळे उमेदवारी करणार आहेत, तर पार्थ पवार यांच्या उमेदवारीसंदर्भात शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवाराला संधी द्यावी, असा विचार आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला पार्थला उमेदवारी देण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत.”

काय म्हणाले शरद पवार?

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.