AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता राहुल गांधींनीच भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय’, भाजप नेत्याचा खोचक टोला

उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत हातात कमळ घेतलं आहे. यावरुन माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधलाय.

'आता राहुल गांधींनीच भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय', भाजप नेत्याचा खोचक टोला
राहुल गांधी, काँग्रेस नेते
| Updated on: Jun 09, 2021 | 4:18 PM
Share

मुंबई : उत्तर प्रदेश काँग्रेसला मोठा हादरा बसलाय. कारण, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जितिन प्रसाद (Jiten Prasada) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रेल्वेमंत्री पियूष गोयल, भाजप खासदार अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. जितिन प्रसाद यांनी नुकतीच अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत हातात कमळ घेतलं आहे. यावरुन माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधलाय. (Nilesh Rane criticizes Rahul Gandhi over Jitin Prasad’s BJP entry)

“राहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे, मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे”, अशा शब्दात निलेश राणे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

कोण आहेत जितिन प्रसाद?

जितिन प्रसाद हे 2009 मध्ये उत्तर प्रदेशच्या धौराहा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. यूपीए-2 सरकारच्या काळात जितिन प्रसाद यांनी पेट्रोलियम आणि रस्ते वाहतूक ही खाती सांभाळली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, आजही उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर, लखीमपूर आणि सीतापूर परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. एक संयमी आणि विकासाभिमुख नेता म्हणून जितिन प्रसाद यांची ओळख आहे.

भाजप हाच खरा राष्ट्रीय पक्ष

मला याची जाणीव झाली की मी आता लोकांची मदत करू शकत नाही किंवा त्यांचे हितसंबंध जपू शकत नाही. माझ्या आयुष्याला नवी सुरुवात होत आहे. मला इतक्या वर्षांपासून साथ दिल्याबद्दल मी काँग्रेसमधील लोकांचे आभार मानतो. पण आता मी पूर्णपणे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये मला हे जाणवलं आहे की जर कुठला पक्ष खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असेल, तर तो भाजपा आहे, असे उद्गार जितीन प्रसाद यांनी पक्षप्रवेशावेळी काढले.

संबंधित बातम्या :

‘अहंकाऱ्यांनो जरा शिका’; नितीन राऊतांकडून कार्टुनद्वारे पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

‘मुंबई महापालिकेनं नाल्यातील गाळाऐवजी नागरिकांच्या करातून माल काढला’, केशव उपाध्येंचा हल्लाबोल

Nilesh Rane criticizes Rahul Gandhi over Jitin Prasad’s BJP entry

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.