AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | पप्पाच्या पप्पूने मुलीला त्रास देण्यासाठी जनतेचे 82 लाख उडवले, कंगनाची आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर टीका

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या केवळ वादांमुळे चर्चेत आहे. जेव्हापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या मुंबई येथील कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम पडल्यापासून, ती सतत राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहे.

Kangana Ranaut | पप्पाच्या पप्पूने मुलीला त्रास देण्यासाठी जनतेचे 82 लाख उडवले, कंगनाची आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर टीका
| Updated on: Oct 28, 2020 | 5:03 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या केवळ वादांमुळे चर्चेत आहे. जेव्हापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या मुंबई येथील कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम पडल्यापासून, ती सतत राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहे. यावेळी तिने वकिलांवर 82 लाख रुपये खर्च केल्याबद्दल ठाकरे सरकार आणि बीएमसीवर निशाणा साधला आहे. (Kangana Ranaut Vs Thackeray Sarkar) या संदर्भात कंगना रनौतने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कंगना म्हणते की, ‘बीएमसीने माझे कार्यालय बेकायदेशीरपणे पाडण्यासाठी वकिलांवर आत्तापर्यंत 82 लाख रुपये खर्च केले आहेत. एका मुलीचा छळ करण्यासाठी पप्पाचा पप्पू सार्वजनिक पैशांचा वापर करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.’

दसरा मेळाव्यात कंगनावर टीका अभिनेत्री कंगना रनौत आणि ठाकरे सरकारमधील वाद निवळण्याची काही चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत. अलिकडेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अभिनेत्री कंगना रनौतवर शाब्दिक हल्ला केला होता. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी महापालिकेने (BMC) आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या एच-पश्चिम विभागीय कार्यालयाने कंगना रनौतच्या वांद्रे पाली हिल येथील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. याप्रकरणी कंगना रनौतने उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती पालिकेने माहिती अधिकारांतर्गत दिली आहे. पाली हिल येथील घरात मणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालय अभिनेत्री कंगना रानौतने वांद्रे पाली हिल येथील आपल्या घरात मणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालय सुरु केले होते. या कार्यालयात कंगनाने बेकायदेशीर बांधकाम केले होते. याच दरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्याचे मुंबईत याचे पडसाद उमटले होते. मुंबई महापालिकेने कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी 354 कलमान्वये नोटीस दिली होती. या नोटीसीला योग्य उत्तर दिले नसल्याने, पालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले होते कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले जात असताना कंगणाच्या वकिलाने आपण उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचे निदर्शनास आणल्यावर तोडकाम थांबण्यात आले होते. कंगणाच्या बेकायदेशीर काम तोडण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. या प्रकरणी मुंबई महापालिकेने कोणत्या वकिलाची नियुक्ती केली आणि त्यांना किती रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी मागितली होती. याबाबत माहिती देताना या प्रकरणी पालिकेची उच्च न्यायालयात मांडण्यासाठी अस्पि चिनॉय यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना पालिकेने 22 सप्टेंबर रोजी 3 वेळा, 7 लाख 50 हजार तर, 7 ऑक्टोबर 8 वेळा, 7 लाख 50 हजार रुपये, असे एकूण 82 लाख 50 हजार रुपये मानधन म्हणून अदा केले आहे, अशी माहिती पालिकेच्या माहिती अधिकार कायदा विभागाने दिली आहे.

संबंधित बातम्या :

‘यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?’ दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या टीकेला कंगना रनौतचा प्रत्युत्तर

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रनौतच्या विरोधात आणखी एक याचिका दाखल, 10 नोव्हेंबरला होणार सुनावणी

(Kangana Ranaut Vs Thackeray Sarkar)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.