Karan Johar | गोव्याच्या सौंदर्याचे नुकसान केल्याचा आरोप; करण जोहरच्या टीमवर कंगना रनौत संतापली

चित्रपट निर्माते करण जोहर यांची धर्मा प्रोडक्शन ही कंपनी सध्या वादात आहे. गोव्यातील नेरुळ या छोट्याशा गावात चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्याठिकाणी प्लास्टिकच्या काही प्लेट, चमचे आणि इतर प्लास्टिक कचरा आणि वापरलेल्या पीपीई किट गावातील परिसरात फेकून देण्यात आल्या आहेत.

Karan Johar | गोव्याच्या सौंदर्याचे नुकसान केल्याचा आरोप; करण जोहरच्या टीमवर कंगना रनौत संतापली
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 1:39 PM

मुंबई : चित्रपट निर्माते करण जोहर यांची धर्मा प्रोडक्शन ही कंपनी सध्या वादात आहे. गोव्यातील नेरुळ या छोट्याशा गावात चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्याठिकाणी प्लास्टिकच्या काही प्लेट, चमचे आणि इतर प्लास्टिक कचरा आणि वापरलेल्या पीपीई किट गावातील परिसरात फेकून देण्यात आल्या आहेत. हे गाव गोव्याची राजधानी पणजीपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे येथील रहिवाश्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. आता या वादात अभिनेत्री कंगना रनौतनेही उडी घेतली असून चित्रपटसृष्टीचा पर्यावरणाला धोका असल्याचे कंगना रनौतने म्हटले आहे. शकुन बत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी काम करत आहेत.( Kangana Ranaut angered to Karan Johar’s team)

कंगना रनौतने ट्विटमध्ये म्हटले आहे की, चित्रपट उद्योग हा देशाच्या संस्कृती आणि नैतिकतेसाठी केवळ एक विषाणू नाही, तर आता हा उद्योग पर्यावरणासाठीही अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यानंतर कंगना पुढे म्हणते, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर कृपया या बड्या प्रोडक्शन हाऊसची बेजबाबदार वागणूक पहा आणि यावर कारवाई करा. कंगना आणखी एक ट्विट करत म्हणाली की, ‘ही असंवेदनशीलता आणि विसंगत वृत्ती अतिशय निराशाजनक आहे. फिल्म युनिट्समध्ये महिला सुरक्षा, आधुनिक पर्यावरणीय ठराव, चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि कामगारांना चांगले अन्न मिळावे, या संदर्भात कठोर नियमांची आवश्यकता आहे. या बाबींची तपासणी करण्यासाठी शासनाने एक स्वतंत्र विभाग निर्माण केला पाहिजे. गोव्यातील पर्यावरण संर्वधन कार्यकत्यांनी या घडलेल्या प्रकरणाबद्दल करण जोहरला माफी मागण्याचे आवाहन केले आहे. करण जोहरने या प्रकरणात माफी मागितली नाही, तर करण जोहरच्या मुंबई कार्यालयात हा कचरा पाठवण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. पर्यावरण संर्वधनमधील एक कार्यकर्ता म्हणतो की, हा कचरा जुहू, लोखंडवाला किंवा वर्सोवामध्ये अशा मोकळ्या जागी टाकण्याची हिंमत करू शकते का? जर असे झाले तर या वरून त्याठिकाणी किती मोठ्या प्रमाणात हंगामा होऊ शकतो. रस्त्यावर कचरा टाकणे हा गुन्हा आहे. आणि गोव्याच्या स्थानिक कायद्यांनुसार कुठेही कचरा टाकणे प्रतिबंधित आहे.

संबंधित बातम्या : 

Karan Johar | ड्रग्ज प्रकरणातून करण जोहरला ‘क्लीन चीट’, फॉरेन्सिक लॅबकडून ‘हा’ दावा!

करण जोहरच्या पार्टी व्हिडीओमुळे ड्रग्ज प्रकरणात खळबळ, बडे अभिनेते रडारवर

(Kangana Ranaut angered to Karan Johar’s team)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.