AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेचं बिगुल, मार्चच्या पहिल्या आठवड्यात तारखा जाहीर?

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखांची घोषणा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. निवडणूक आयोग मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करु शकतो. त्यामुळे देशात एप्रिल ते मे महिन्यादरम्यान निवडणुका होऊ शकतात. लोकसभा निवडणूक 2019 साठी देशभरात 6-7 टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. सध्याच्या लोकसभेचा […]

लोकसभेचं बिगुल, मार्चच्या पहिल्या आठवड्यात तारखा जाहीर?
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM
Share

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखांची घोषणा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. निवडणूक आयोग मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करु शकतो. त्यामुळे देशात एप्रिल ते मे महिन्यादरम्यान निवडणुका होऊ शकतात. लोकसभा निवडणूक 2019 साठी देशभरात 6-7 टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ येत्या 3 जून 2019 रोजी संपणार आह, त्यामुळे नवीन लोकसभा स्थापन होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोग सध्या ही निवडणूक कशाप्रकारे आणि कधी घ्यायची याची तयारी करत आहे.

निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केल्यानंतर सर्वत्र आचारसंहिता लागू होईल. यानंतर विद्यमान मोदी सरकार कुठल्याही योजनेची घोषणा करु शकणार नाही. 543 सदस्यांच्या लोकसभेत सध्या भाजपचे 282, काँग्रेसचे 45, शिवसेनेचे 18, समाजवादी पार्टीचे 05 तर इतर पक्षांचे 212 खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर 17 व्या लोकसभेची स्थापना होणार आहे.

सुरक्षा रक्षकांची गरज आणि त्यांच्या उपलब्धतेनुसार निवडणुकांचे टप्पे ठरवले जातील. यासर्व व्यवस्थांची चाचणी केल्यानंतर निवडणूक आयोग मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा करु शकतो. लोकसभा निवडणुकांसोबतच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणाही निवडणूक आयोग करु शकतो. तर जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा भंग झाल्याने सहा महिन्यांच्या आत तिथे निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

याआधी झालेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा 5 मार्च 2014 रोजी झाली होती. ही निवडणूक 9 टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती. 7 मे ते 12 मे 2014 दरम्यान ही निवडणूक झाली होती, तर 16 मे 2014 रोजी मतमोजणी झाली होती. त्यानंतर 26 मे 2014 रोजी मोदी सरकार सत्तेत आलं होतं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.