AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेचं बिगुल, मार्चच्या पहिल्या आठवड्यात तारखा जाहीर?

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखांची घोषणा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. निवडणूक आयोग मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करु शकतो. त्यामुळे देशात एप्रिल ते मे महिन्यादरम्यान निवडणुका होऊ शकतात. लोकसभा निवडणूक 2019 साठी देशभरात 6-7 टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. सध्याच्या लोकसभेचा […]

लोकसभेचं बिगुल, मार्चच्या पहिल्या आठवड्यात तारखा जाहीर?
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM
Share

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखांची घोषणा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. निवडणूक आयोग मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करु शकतो. त्यामुळे देशात एप्रिल ते मे महिन्यादरम्यान निवडणुका होऊ शकतात. लोकसभा निवडणूक 2019 साठी देशभरात 6-7 टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ येत्या 3 जून 2019 रोजी संपणार आह, त्यामुळे नवीन लोकसभा स्थापन होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोग सध्या ही निवडणूक कशाप्रकारे आणि कधी घ्यायची याची तयारी करत आहे.

निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केल्यानंतर सर्वत्र आचारसंहिता लागू होईल. यानंतर विद्यमान मोदी सरकार कुठल्याही योजनेची घोषणा करु शकणार नाही. 543 सदस्यांच्या लोकसभेत सध्या भाजपचे 282, काँग्रेसचे 45, शिवसेनेचे 18, समाजवादी पार्टीचे 05 तर इतर पक्षांचे 212 खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर 17 व्या लोकसभेची स्थापना होणार आहे.

सुरक्षा रक्षकांची गरज आणि त्यांच्या उपलब्धतेनुसार निवडणुकांचे टप्पे ठरवले जातील. यासर्व व्यवस्थांची चाचणी केल्यानंतर निवडणूक आयोग मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा करु शकतो. लोकसभा निवडणुकांसोबतच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणाही निवडणूक आयोग करु शकतो. तर जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा भंग झाल्याने सहा महिन्यांच्या आत तिथे निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

याआधी झालेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा 5 मार्च 2014 रोजी झाली होती. ही निवडणूक 9 टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती. 7 मे ते 12 मे 2014 दरम्यान ही निवडणूक झाली होती, तर 16 मे 2014 रोजी मतमोजणी झाली होती. त्यानंतर 26 मे 2014 रोजी मोदी सरकार सत्तेत आलं होतं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...